Monday, November 17, 2014

RIP... अभी

रोज सकाळी ऑफिसल्या आल्यावर गुडमॉर्निंग करणं असो वा घरी जाताना बाय करणं असो रोजचं त्याचं आमच्यसोबत राहणं आत सवयीचंच झालं होतं... कामाचा कंटाळा आला की जरा त्याच्या जवळ जायचं आणि त्याला आवाज द्यायचो.. तो कुठेही पाण्यात लपाला असला की भुरकन, पटकन हाकेला ओ देण्यासाठी येई. मोरपंखी रंगांचा माझा ’अभी’(फायटर फिश) कधीच तो एक मासा आहे असं त्याला ट्रीट नाही केलं. ऑफिसमध्यल्या सगळ्यांनाच त्याची सवय झाली होती... सुनिल सर तर कामाचा वैताग आला की येत त्याच्या जवळ उभे राहून हवं ते बडबड करत... मग त्यात त्यांच्या प्रेमाने दिलेल्या ’भ’यंकर अशा शिव्या ही असत. त्याला आवाज दिला की चटकन वर येऊन जणु तो सुद्द्धा आपल्याशी बोलू पाहतोय असंच वाटायचं.
फायटर फिश म्हणजे माझा ’अभी’. काही गोष्टी आयुष्याचा एक अविभाज्य घटक केव्हा बनत जातात तेच कळत नाही. अभी सुद्धा तसाच एक आयुष्यात मिळालेलं सर्वात सुंदर गिफ्ट. माझ्या २५ व्या वाढदिवसाला मिळालेलं अनमोल असं सरप्राईझ... मी म्हणजे त्याची गर्लफेंड्च आहे, असंच सगळे बोलायचे, चिडवायचे... तुषार त्याचा मामा, लक्ष्मी त्याची आत्या, प्रमोद त्याचा आजोबा, असं बरंच जण त्याचे कोणी ना कॊणी नातलग झालो होतो. एकदा तर आम्ही कहरच केला... ’अभी’चं लग्न करुया असं ठरवलं.. लग्न म्हणजे त्याच्यासाठी एक फिमेल फायटर फिश आणायचं... लग्नाचा हा मस्त कार्यक्रमही आम्ही ऑफिसमध्ये केला... खूप धम्माल केली. या मजा मस्तीत जेष्ठ राधा मॅम, शास्त्री सर यानी पण त्यांचा उत्साह दाखवला... आमचा मस्तीखोर पणा होता पण त्यात मजा ही होती खूप. अभीच्या बायकोचं (फिमेल फायटर)नाव नेत्रा ठेवलं आम्ही. पण दुर्देव असं झालं की.. जसं मनुष्याजातीत बायको आल्यावर नवरा आपोआप शांत होतो. तसंच काहीसं अभीचं झालं.. तो अजिबात जागचा हलायचाच नाही.. त्याची मोरपंखी पिसं पण त्या नेत्राने खाल्ली होती की काय देव जाणे, दोनच दिवसात ’अभी’ला ‘बिचारा’ करुन टाकलं होतं. मग अभीला जास्त त्रास नको म्हणून नेत्राला पुन्हा आम्ही फिशवाल्या काकाकडे देऊन आलो. 

आता पुन्हा तो एकटा झाला आणि पहिल्यासारखा सुखी आणि आनंदी झाला. त्याच्या सोबतीला कोणीतरी घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न फसला होता. पण या सगळ्यात मस्त मजा, गंम्मत होती. अभीची काळजी घेणं असो वा रोज त्यांचं खाणं असो.. सगळेच मनापासून करायचे.. नवीन कोणी ऑफिसला आले की त्याच्याबरोबर खेळत बसायचे.. त्यांचं नाव अभी आहे असं सांगितलं तर हसायचे पण स्वतः अभी ला हाक मारयला सुरवात करायचे. जो कोणी त्याला बघायला जायचा तो त्याला खाऊ टाकायचा... आणि मग काय सगळं फिश बाऊल खाऊने भरायचं.. मग आम्ही ठरवलं कोणीतरी एकानेच त्याला खाऊ द्यायचा. तुषार, विनिशा, विकास, सुनिल सर आठवणीने त्याची काळजी करायचे... 

इसको कुछ डाला की नै खाने को, अर्चना ये तेरा अभी कुछ काम नै करता दिनभर पाणी मै मस्त घुमते रेह्ता है.. तेरे जैसी गर्लफेंन्ड रहेगी तो क्या टेन्शन है यार इसको... नेहमीचं ठरलेले सुनिल सरांचे शब्द आजही कानावर येतात. जगण्यातला वागण्यातला एक घटकच झाला होता जणू अभी.

माहिमचं जुनं ऑफिस सोडलं आणि आता दादर ला शिफ्ट झालो... नवीन वातावरण, नवीन जागा सगळं काही आम्हांला नवीन आणि अभीला पण, आज दोनच आठवडे झाले शिफ्ट होऊन शनिवार- रविवार ऑफिसला सुट्टी असल्यामुळे बहुतेक अभीची नीट काळजी घेतली गेली नाही आमच्याकडून आणि तो गेला आमच्यातून. तुषार आज त्याला खाऊ टाकताना तो काही पाण्यातून वर आलाच नाही. शांत पाण्यात एका कोपऱ्यात पडला होता. मी पटकन त्याला पाण्यातून बाहेर काढलं. तळहातावर घेतलं. तो नव्हता आता आमच्यात. बहुतेक दोन दिवस ऑफिस बंद आणि वातावरणात होणारे बदल याचा त्याला त्रास झाला असावा. भावनांचा कडेलोटच झाला होता. पण स्वःला सावरणं गरजेचं होतं. उगाच लोकं हसतील याचा विचार केला आणि भावनांना आवर घातला पण कडेलॊट झालाच जेव्हा प्रमोद आपण नवी अभी आणूया म्हटला... एखाद्या अमूल्य गोष्टीची जागा कधीच कोणीच घेऊ शकत नाही हे त्याला सांगण्याची इच्छा होती पण नाही बोलता आले. तो फक्त एक अभी नावाचा फायटर फिश नव्ह्ता.. त्यामागच्या भावना, प्रेम, इच्छा सगळ्या वेगळ्या होत्या. ’अभी’चं माझ्या आयुष्यातलं अस्तित्व होतं. त्याच्या नावाचा उल्लेख माझ्या आजुबाजूला सतत होत राहणं, हेच जगणं होतं त्याच्यासोबतचं माझं. प्रेमाच्या पलिकडचं अवास्तव नातं. माझ्या स्वतःच्या आयुष्यातला अमूल्य ठेवा, ज्याने रोजचं जगणं रोजचं त्याचं असणं खूप आधार देणारं होतं. आपलं हक्काचं काहीतरी आहे जे आपल्याला कधीच सोडून नाही जाणार असा वाटणारा विश्वास यात होता... माझ्या अभिजीतशी जोडलेल्या भावना तो सोबत नसताना आयुष्यात असण्याची जाणीव करणारा अभी पण नाही आता सोबत माझ्या. माझ्या स्टोरीचा दि एन्डच झाला आहे आता कायमचा. अभी नावाचं माझ्या भोवतीचं जग.. त्याचं वलय सगळं काही कायमचं संपुष्टात आलंय. Now he is dead for me… Forever… RIP Abhi…  

The END
F O R E V E R ...     

Monday, June 9, 2014

अब वो बात नही है...

ये गरमी.. नकोसा केलय या गरमीने मुंबईकरांना... ट्रेनची गर्दी, बसचा प्रवास अगदी नकोसा होतं सगळं. कधी एकदाचा पाऊस पडतोय. असंच सगळ्यानां वाटतेय... यंदाच्या वर्षी मुबंईकरांना पाऊस बऱ्याच वेळा हुलकावणी देतोय. आज येईल, आता येईल.. मस्त थंड थंड वातावरण निर्माण करुन हा पाऊस काही केल्या येत नाही... मग अजूनच घामाचा घमघमाट. यंदाचा पावसाळा मला तरी जामच बोर वाटतोय. का कुणास ठावूक.. पहिला पाऊस.. मज्जा.. फिरायला जायचं प्लॅन... काहीच जाणवत नाहीये, मन जागेवर नसल्याची जाणीव होतेय. पावसाच्या नावानेच चिडचिड व्हायला लागलीये यारर... हुश्श! 

पावसाची सगळ्यांची परिभाषा वेगळी असते... पहिला पाऊस आणि पावसासोबत येणारी तुझी आठवण, पहिला पाऊस आणि मी... पाउस आणि एक कप चाय असं बरचं काही. यंदाच्या पावसात मी पहिल्यांदा खूपच भिजणार आहे, मी प्रेमात पडलोय... आणि ती मुलगी नाही म्हणाली. हा हा ! मला खूप आनंद झालाय यार मला हवी तशी मुलगी ती आहे. आणि मला तोच क्षण, तोच आनंद एन्जॉय करायचा आहे. असं माझ्या एका मित्राचा वैयक्तिक मत एकलं... पावसात रडणाऱ्याचे अश्रू दिसत नाहीत, म्हणूनच बहुतेक याला पावसात भिजून आनंद आणि दुखः व्यक्त करायचं असेल... त्याला समजवण्यासाठी मी म्हणाले, "तु नही तो कोई और ही सही" असा विचार कर आणि जास्त रडू नकोस, नाही तर मुंबईचा परत २६ जुलै व्हायचा. तो  म्हणतो.. आपल्याला हवं असणारं व्यक्तीमत्व हवी असणारी प्रतिमा जी आपल्या नजरेत असते ती अचानक समोर आली ना.. की नाही रिप्लेस करु शकत आपण... अखंड प्रेमात बुडालाय हा पोरगा असंच पटकन जाणवलं... विषय इकडेच बंद केला मी मग.. मज्जा कर पावसात रे बाबा!  प्रेमात पडल्यावर... पावसावरह प्रेम करणारी अशी बरीच उदाहरण असतात आपल्यातच...

      नसती उत्तरे द्यावी लागतात, वेड्यासारखं वागल्यावर...
  पण वेड्यासारखं वागायल होतं, पाऊस पडायला लागल्यावर... <3 
पावसाची मज्जा, पावसाची प्रत्येक सर जणु आपल्याचसाठी आहे असा विचार करणारी, तर पाउस म्हणजे ईईई... किचकिच, चिखल, सगळीकडे ओलं. अगदी नकोसा जीव होतो या पावसात असे विचार करणारे पण बरेच असतात... यंदा मी पण पाऊस न आवडणाऱ्या लोकांच्या कॅटॅगरीतच आहे बहुतेक. "कुछ फिल नही हो रहा यार, अब वो बात नही है", असं सारखं जानवतं. कधी कधी आपण काही गोष्टींवर व्यक्तच होत नाही. तसाच आहे यंदाचा पावसाळा माझ्यासाठी, ‘ना आनंद आहे ना दुखः’ मनात प्रेम आणि समाधान असेल तर माणूस नेहमीच आनंदी राहतॊ असा माझा आतापर्यंतच अनुभव... पण भावनाशून्य जग झालयं सगळं, भावनाचां खेळ इतका अनुभवलाय की स्वतःच भावनाहीन झालेय, आता एकांत हवा आणि तो एकांत शोधण्याची मनाची धडपड आहे फक्त... यंदाच्या पावसात एकांत मिळतोय का बघूया...

माझ्या मित्रांचे मस्त ट्रेकिंग प्लॅन चालू झालेत... रोज नवीन नवीन प्लॅन बनत आहेत.. बघू आता पाऊस नक्की कधी येतोय आणि प्लॅन किती यशस्वी होतोय यांचा... येरे येरे पावसा, तुला देतो पैसा... या गाण्याच्या स्वरात नाचणारी लहान मुलं बघायला मी नक्कीच आतुर आहे... लवकर ये रे पावसा... मला तुझी आठवण येत नसली तरी तुझी वाट बघणारे खूप आहेत.... ये लवकर !               

F O R E V E R ...               

Thursday, May 8, 2014

बच्चे मन के सच्चे ...


बच्चे मन के सच्चे ...
'मे' महिना म्हणजे सुट्टीचा महिना, `आया मौसम डर्मी कुल का' हे शब्द हमखास कानावर पडतातच. उकाडा, गर्मी ने हैराण सगळे…सगळ्यामध्ये  निवांतपणा, शांतता, बोजडपणा आल्याचा अनुभव  असेल…कामातपण कंटाळा आलाय. पण "इस बार कुछ नया है यह!"   यंदा आमच्याकडचा 'मे' महिना जरा जोरातच आहे. रूपा म्हणजे माझी  आते बहिण हिचं 'लग्न', आता हे घरचं लग्न तर धम्माल येणारंच…जरासं वेगळं वातावरण तर आहेच…आमच्या इकडच्या लहान मुलांचा तर कल्लांच आहे. रूपा एकदम भारीच आहे, आमच्या इमारतीत काही ही कार्यक्रम असो रूपा सगळ्या मुलांना प्रोत्साहन देण्यास एक नंबर… पूजा असली की लहान मुलांना डान्स शिकवण्यापासून त्यांचा मेकअप करणं, त्यांना वेगवेगळे गेम्स खेळायला शिकवणं सगळं काही भारीच करते ती. म्हणूनच सगळ्यांची आवडती ताई आहे ती… या ताईच्या लग्नासाठी आम्ही सगळेच फार उत्सुक आहोत…   
    
    गप्पा टप्पा मारायला काल सहजच म्हणून टेरेस वर गेले रात्री उशिरा. आमची बच्चे कंपनी तर होतीच तिकडे  गोंधळ  सुरुच होता… १०-१५- च्या वयोगटातील मुलं कसली फास्ट झाली आहेत हे त्यांच्यात बसल्यावर कळालं… आपल्याला वोडका म्हणजे काय वयाच्या २४ व्या वर्षी कळाले असेल (मला तरी हां!) पण मी सहजच माझा फोन बघत होते… तर whatss app वर एक फोटो फिरतोय सगळ्यांना माहितच आहे मुलगी शिकली आणि प्रगती झाली… आणि त्या फोटोमध्ये मुली दारू पित आहेत.  त्या बघा व्होडका किंवा बिअर पित असणार . बापरे! हे ऐकून तर मला आश्चर्याचा धक्काच  बसला.  एवढीशी पोरं कसं माहित सगळं यांना
 इतकेच नव्हे तर जोक्स सांगत होतो सगळे तर एकीनं सांगितलं… कॉलेजकी लडकी... मारती है धक्का …नही  दिया मुका... तो बोलती ही छक्का…. अरे  बापरे असे जोक्स मी तरी अजून ऐकले नव्हते.  हसून हसून वेडे झालो आम्ही सगळे. अजून एक किस्सा झाला, काकाचा मुलगा आलाय गावावरून इकडे , एका रात्री त्याच्या अचानक खूपच पोटात दुखायला लागलं  खूपच रडत होता. त्याला डॉक्टर कडे घेऊन जायला निघाले तर म्हणतो. नको नको मला बाळ नको, मला नाही जायचं डॉक्टरकडे.  हा हा हा हा !!! खरंतर  नुकतेच आमच्या घरी एक बाळ  झालंय . काकीच्या पोटात दुखायला लागल्यावर तिला डॉक्टरकडे नेले आणि तिला बाळ झालं हे त्याने पहिलं होतं बहुतेक.  तर पोटात दुखतंय म्हणून दवाखान्यात नेलं आणि बाळ झालं काकीला इतकंच त्याला माहित  असावं. आम्ही या किश्श्या वरुन प्रचंड हसलो .

आजकालची लहान पोरं खरंच खूपच फास्ट झाली आहेत. मोबाईल तर सर्रास वापरतात, ही लहान मुंलांबरोबरची संध्याकाळ भन्नाटच होती. आता अजून खूप वेळ आहे माझ्याकडे या चिल्ल्या- पिल्ल्यांसोबत वेळ घालवायला … कारण पूर्ण मे महिना बाकी आहे आता… निखळ मज्जा आणि नवीन काहीतरी शिकायचं असेल ना  तर तुम्ही पण नक्की कधीतरी असा लहान मुलांमध्ये वेळ घालवून बघा… स्वतःला  किती फ्रेश फिल कराल.
  
चला इतकच … मला लग्नाची तयारी करायची आहे …  लग्नाची धम्माल लवकरच लिहिन… आमच्या लाडक्या ताईच्या लग्नाला या हा !

F O R E V E R ...

Tuesday, January 21, 2014

आज मौसम बडा बेइमान है...

आज मौसम बडा बेइमान है... हे आज सहजच ओठांवर आलं... आजचं मुंबईचं वातावरण बेईमानं झालंय... खरं तर सकाळी उठले तेव्हा खिडकीतून बाहेर पाहिलं... अंधार,अंधार.. मी फारच लवकर उठलेय की काय असंच वाटलं पण छे... मी आणि लवकर उठणार... हाहाहा! घड्याळ्यात नेहमीचीच वेळ झाली होती... जास्त बाहेर लक्ष न देता ऑफिसला जाण्यासाठी आवरायला घेतलं... अरे बापरे... घराबाहेर पडले तर काय सगळीकडे मस्त मातीचा सुगंध, सगळी कडे रिम झिम बरसणारा पाऊस... थंड थंड वातावरण... आज रोजच्या बोचणाऱ्या थंडीपेक्षा भारीच थंडी होती... हळूवार प्रेमाचा स्पर्श जसा छान छान वाटतो ना तशीच्च आजची थंडी हळूवार स्पर्श करणारी...

अशा भारी वातावरणात मरिन ड्राईव्ह ला जाण्याचा मोह मला आज झालाच... आली लहर केला कहर असंच काहीतरी आज झालं माझं... जायचं होतं मला ऑफिसला... पण पावलांना ही कळलं नाही वाट मरिन ड्राईव्हची कधी धरली... खरं तर खूप विचार केला नको जायला...पण नेहमीप्रमाणे मी लवकरच ऑफिसला पोचणार होते... लवकर जाण्यापेक्षा मरीन ड्राईव्हा ला जान येऊया असा मनाचा निर्णय झालाच की पक्का... आणि मग... आमची स्वारी खुशीतच ना... चर्नीरोडला उतरले... आनंद तर होताच त्यापेक्षा भारी तर शांतता होती माझ्या सोबतची... एकट्याने असं मरिन ड्राईव्ह आणि ते पण सकाळी सकाळी... च्याला मला वेडेच म्हणतील लोकं... असं वाटलं थोड्यावेळासाठी... पण who cares... बिनधास्त एकदम... मोबाईवर गाणी ऎकत पोचलेच....
आणि....मरिन ड्राईव्ह! आलंच... कॉलेजच्या मुलामुलींचे बरेच ग्रुप होते... काही कपल्स होते...काही मॉर्निंग वॉकसाठी फिरणारे आजी-आजोबा.... बरेच जण.... आणि बाकी होता तो अथांग ‘समुद्र’..... थंड वातावरणात आपण शाल घ्यावी तशीच समुद्रानेही धुक्यांना शाल म्हणून ओढलं असेल की काय असंच क्षणात वाटलं...  निशब्द होऊन फक्त पाहत राहावं.... हे सुंदर आणि देखणं रुप समुद्राचं!

तशी माझी ही पहिलीच वेळ एकट्याने इकडे येण्याची... जे पाहत होते ते सगळं नवीनंच होतं. नजर जिथपर्यंत जात होती तिथपर्यंत फक्त समुद्र... शांतता! एकांत खूप मजेशीर असतो हे पहिल्यांदाच कळालं... पावसाळ्यात मरिन ड्राईव्हला दरवर्षी एकतरी वारी होतेच फ्रेण्ड्स बरोबर... फ्रेण्ड सर्कलबरोबरची मजा मस्ती आठवतेय आजही... इकडच्या मुलांना बघून... आणि आठवण झाली माझ्या बेस्ट फ्रेण्डची... फोन लावला तिला... मोठ्य़ाने ओरडून सांगितलं... तुला माहित आहे का... मी मरिन ड्राईव्हला आहे... माझ्या आवाजात जितका आनं होता ना तितकीच शांतता तिच्या आवाजात होती... ती बहुतेक ऑफिसमध्ये होती... शानी मला म्हणते... अरे ये तेरेको ऑफिस नही है क्या? आज छुट्टी क्या?... मूड खराब केला यारजानेवाली हूं रे मै ऑफिस... बस्स तुझे मिस कर रही हुं... तु भी चाहिये थी यहां.... मस्त लग रहा है सब... मी बोलतच राहिले... अरे मुझे कामधंदा है रे फिस मे, तेरे जैसे नहीं... अब तु जो वहा देखेगी, उसको लिखेगी, लिखने के तेरे को पैसे मिलेगें... ब्ला ब्ला... असं बरचं काही बोलतच गेली... माझ्या डोळ्यांत टचकन पाणी केव्हा आलं हे कळलंच नाही... ज्यांना आपण आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक समजावं आणि त्यानं आपल्या भावनांना समजून न घेता... आपण सारं काही फक्त पैशासाठीच करत असतो असं समजावं... खूपच हर्ट झालं तिचं बोलणं... बहुतेक तिला माहित नसावं ती काय म्हणाली... बोलता बोलता मस्करीत बरंच काही बोलून गेली होती... 

लेख करणं माझा छंद आहे याचा अर्थ असा नाही होत की मी नेहमी लिहिण्यासाठीच अनुभव घेत असते... लाईफचा सुंदर क्षण तिच्यासोबत शेअर करावासा वाटला होता म्हणून फोन केला होता मी... पण नाही कळलं तिला... बहुतेक तिला समजणारही नाही कधी... मी बोलता बोलता कट केलेला फोन तिला कळला नाही... मी रागावले असेल याची जाणीवही तिला झाली नाही... च्याला हे असे फ्रेण्ड्स पण ना, कधी कधी डोक्यातच जातात... भारी दिवसाची... भारी क्षणाची वाटच लावली... पावसात रडणाऱ्याचे अश्रू दिसत नाहीत असं कोणीतरी म्हटलं होतं ते बहुतेक खरंच होतं... खरं तर मला राग येण्यासारंखं काही झालचं नाही... पण तरीही वाईट वाटलं... खूपच भावनिक होतंयार अस्सं एकटं फिरलं की... च्याला तु गेलीस खड्यात नेक्स्ट टाईम बुला तु मुझे कभी घुमने, तब बताती हूं तुझे मेरा काम... हर एक फ्रेण्ड जरुरी होता है असं म्हणत तिला माफही केलं... चल तु भी क्या याद रखेगी.... फूट्ट अब.... हाहाहा! खडूस है यार तू... और खडूस ही रेह... मै कुछ भी बोल रही हूं क्युंकी मुझे पता है तु कभी मेरा ब्लॉग पढेगी नही... च्यायला मराठी सिख ले जरा... नकळत का होईना समोरच्याच्या भावनांची कदरच नसेल तर कमीत कमी दुखवू तरी नकोस च्यायला... आज मौसम बडा अच्छा था.. पर उसे बेइमान तुने बना ही दिया...    
ऑफिसला मस्त लेट झाला आज... Boss चा फोन आलाच मला... मॅडम कुठे फिरताय म्हणून.... आम्ही एफ.बी ला स्टेटस टाकले होते... ते Boss ने पाहिलेच की... आणि मग काय... मज्जा ना..... आज नाश्ता म्हणून Boss चा ओरडाच खाल्ला.

F O R E V E R ...

Wednesday, January 15, 2014

मै जिंदगी का साथ निभाता चला...


मै जिंदगी का साथ निभाता चला, हर फिक्र को धुए में उडाता चला... रफीचं हे सदाबहार गीत एफएम वर ऐकत होते. काय जबरदस्त गाणं आहे. लाईफचा फण्डा साहिर लुधियानवीनं एवढा भारी मांडलाय की हजारो पुस्तकं हे ज्ञान सांगायला कमी पडले असते. स्पेशली देव आनंद ज्या पद्धतीने सिगरेट टाकतो ना तेव्हाच नकळत आपलं मन त्या सिगरेटशी तुलना करु लागतं. आपलं मन... अगदी त्या गाण्यातल्या सिगरेट सारखं... कोणीही यावं, शिलगावं आणि निघून जावं. आपण मात्र आनंदीत असतो कि कोणीतरी आपल्या मुळे हिरो म्हणवून घेत असतो. मात्र त्यावेळी आपण हे विसरतो की आपल्यासाठी तो एकमेव हिरो असतो आणि त्याच्यासाठी अशा कितीतरी सिगारेट्स.

प्रत्येकाच्या आयुष्याचं थोड्याफार फरकानं असंच असतं. पण सगळेच त्या हिरोच्या हातातलं थोटूक बनून स्वत:ला संपवत नाही तर वेगळा पर्याय निवडतात. कदाचित यालाच प्रॅक्टिकल लाईफ असं म्हणत असतील. प्रॅक्टिकल लाइफ जगताना सॉलिड मज्जा येते. कोणत्याही भावना नाही. काही अटॅचमेंट नाही फक्त आपलं आयुष्य जगायचं... कोणाचाच विचार करायचा नाही... फक्त मी,  माझं, यावर संपूर्ण जग... प्रॅक्टिकल लाईफ जगण्याचा निर्णय आपण तेव्हाच घेतो, जेव्हा कधीतरी, कुठेतरी मन सॉल्लिड दुखावलेले असते. मग आपणही तयार होतो दुसऱ्याचं मन दुखवायला... मग आपल्याला देखील काही वाटत नाही कारण आपण फक्त स्वत:चाच विचार करतो... मग आपण जगायला लागतो, दुनिया गयी भाड में...अपुन अपने मुड मै...!स्टाईल ने... 
स्वतःच्या भावना  कोणीतरी दुखावल्या की, बदला घेण्यासाठी आपण दुसऱ्याच्या भावना दुखवायच्या आणि समाधान मिळवायचं... आपण खूपच हॅपी आहोत... समाधानी आहोत... खूष आहोत असं खोटं खोटं वागायचं... आपण दुसऱ्याच्या सुखात स्वतःचे सुख शोधणारे होतो, पण आता दुसऱ्याच्या दु:खात सुख शोधायला केव्हापासून लागतो हे आपल्यालाच कळत नाही. मन आपलं असं काही फुलपाखरु बनलंय की फक्त आपण आता मस्त स्वच्छंदी जगायला लागतो. सगळीकडे सगळं काही मस्त मस्त असलं तरी... खरं तर आपण एकटेच असतो. फक्त एकटे आणि आपल्या सोबत असते आपले एकटेपण...

आपल्या भावना, आपलं मन कोणीतरी तोडावं आणि आपण त्याच्यासाठी स्वतःला इतक बदलावं... हे जरा अतीच होतं... आपला स्वभाव, आपल्या भावना, आपलं मन हे जितकं निर्मळ, निरागस, निरपेक्ष तितकेच आपण सुंदर आणि आनंदी असतो...

माझ्या ना नेहमी मनाचं आणि बुद्धीचं जोरदार भांडण चालू असतं... बुद्धी नेहमीच चांगलं सांगते पण त्यात समाधान नसतं... मन नेहमीच फुलपाखरुबनून धावत असतं आणि त्याचंच ऐकायला मज्जा येते... मनाचं म्हणजे दिल की बात ऐकल्यावर जे काही सुख मिळतं ना,हाहाहा... ते शब्दात व्यक्तच होऊ शकत नाही. चेहऱ्यावरचं हसू आणि डोळ्यातलं रडू दोन्ही नक्की काय असतं हे दिल की बातऐकल्यावर आणि तसं केल्यावरच कळतं... अभी अभी दिल की सुनी है, अभी ना करो जमाने की बात... या गाण्याची आठवण झालीच. 

आपल्याला  नेहमीच आनंदी राहायला आवडतं. पण प्रत्येक वेळी निर्णय मनाचा विचार करुन  घेत नाही, प्रॅक्टिकल विचार करायला लागतोच. बहुतेक वेळा बुद्धीने घेतलेले निर्णय कठोर असतात पण आपल्याला लॉंन्ग टर्मसाठी फायद्याचे असतात. मनाचे निर्णय क्षणिक सुखाचे असतात पण लॉंन्ग टर्मसाठी दुःखाचे पण होतात. यार सगळं काही माहित आहे मला पण  इस दिल क्या करु?’ अस्सं मला आणि तुम्हालापण वाटलच असेल ना आता...

बस्स मी ठरवलय, मला कोणीही कितीही दुखावलं तरी मी जशी आहे तशीच राहणार ... मला वाटतं तस्सच जगणार आणि वागणार... हसत हसत इतकचं म्हणायचं यार अगर तुम्हारे जैसे दिल तोडनेवाले होगें तो हम हजार बार अपना दिल तोडने तुम्हारे पास आयेंगे!आपल्या प्रत्येक क्षणात जगण असतं... दिल की बात  कल्यावर क्षणिक सुख जरी आयुष्यात आलं तरी तो लाईफचा बेस्ट टाईमअसतो. जो आपल्याला आयुष्यभरासाठीचा सोबती म्हणून राहतो...त्यालाच आपण सुंदर आठवणी म्हणतो. डोळे बंद केल्यावर एका क्षणात आपल्याला रिफ्रेश करणारे क्षण डोळ्यासमोर येतात तोच आपला बेस्ट टाईम’ ...    

प्रॅक्टिकल लाईफ जगता जगता स्वतःला हरवून बसण्यापेक्षा, स्वतः मस्त आनंदी आणि जसे आपण आहोत तसेच छान छान जगायचं.      
    
F O R E V E R...