जिंदा हु यार
काफी है!
जिंदा हु यार काफी है...
अशी अवस्था आपल्या सभोवताली असणाऱ्या मित्र-मैत्रिणीमध्ये, सहकाऱ्यांमध्ये,
शेजाऱ्यांमध्ये आजुबाजुला कुठे ना कुठे बघायला मिळतेच, कधी कधी तर स्वतःच असे फिल
करत असतो. कालच एका नामांकित कंपनीत चांगल्या पोस्ट्वर काम करण्याऱ्या मित्राचा
फेसबुकवर मेसेज आला. मै जा रहा हू, मुझे अब नही हो रहा. मी विचारला त्याला, अरे
काय झाला. मग त्याचा मेसेज आला, मरणा चाहता हु, बस हो गया, लाईफ हेल हो गयी है. तो
सिरियस होऊन खूप काही बोलत होता. मी मस्करीत घेऊन त्याला काही उत्तर नाही दिले.
आता अचानक अतुल तापकीरची बातमी वाचल्यावर त्याच्या मेसेजची आठवण झाली आणि त्याला
आधी विचारले, अबे जिंदा है क्या तु? मी त्याचा मेसेज आला तेव्हा भावनाशून्य होते.
मस्करीत घेऊन विषय सोडून दिला होता. पण खरचं त्याने काही केले असतं तर, हा विचार मनात
डोकाऊन अस्वस्थ करुन गेला.
हा किस्सा सांगण्याचं
कारण आजकाल सगळ्या सुख-सोई असताना माणूस समाधानी दिसत नाहीये. मानसिक कुंचबना ही
प्रत्येकाच्या आयुष्यात होतच आहे. प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स हे आहेतच, पैसा, वेळ,
आजारपण, नाती, प्रेम, नोकरी या सगळ्याभोवती असणारे आपले जग... यातल्या काही गोष्टी
आपल्याला मिळतात तर काही मिळत नाहीत. प्रेम आहे पण विश्वास नाही, पैसा आहे पण खर्च
करण्यासाठी जीवाला जीव लावणारा माणूस नाही, जगायची इच्छा आहे पण शरीर साथ देत
नाही, शिक्षण आहे पण नोकरी नाही... या पलिकडे उच्चभ्रू लोकांचे टेंशन्स तर वेगळेच
असतात... काही जण धडपत जगतात, काही जण मरण हा एकमेव पर्याय निवडतात...
भावनेच्या आहारी जाऊन जगण्य़ाचा कंटाळा आला की सोपा आणि आयुष्यातला सगळ्यात कठीण मार्ग दिसायला लागतो. तो म्हणजे “आत्महत्या”. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा वाईट काळ हा त्रासदायकच असतो. हा त्रास नकोसा वाटायला लागला, आयुष्याची सगळीचं गणीतं चुकली की , मग आपण म्हणतोच रागात.. यार आपण मरत का नाही? कंटाळा आलाय अशा जगण्याचा... नकोय हे लाईफ.... हे आपण सहजच म्हणत असतो.. पण मरणाशिवाय ज्याच्याकडे काहीच पर्याय नसतो ते काय विचार करत असतील ना?
माझी अगदी जवळची मैत्रिण आहे निशा, वय तीचं असेल साधारण २८ वर्षे, अचानक चक्कर आली म्हणून तिला आम्ही ऍडमिट केले हॉस्पिटला, तेथे तर काही रिपोर्ट्स मुळे कळाले की तिच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या आहेत. अचानक न ध्यानी ना मनी असताना स्वतः बद्दल इतकी मोठी गोष्ट कळवी तिला. सुन्न झालं होत सगळं, तिचे आई- बाबा, भाऊ याची अवस्था तर बघायलाच नको. मला काळ्जी होती तीची, आता कुठे ती स्वतःच्या आयुष्यात रमत होती, तीन महिन्याने लग्न करुन विदेशी सेटल होण्याची स्वप्न पाहणारी ती. नजरेसमोरुन झरझर तिचं बोलणं, हसणं मला दिसत होतं. असं कसं काय होऊ शकते कोणासोबत, किडनी निकामी होणं हा तिच्या नशीबाचा भाग म्हणून दुर्लक्ष करावं की होईल सगळं ठीक म्हणून विचार थांबवावा... आज या गोष्टीला सतरा महिने झाले, किडनी निकामी झाली हे एकण्याच्या आधीच ज्याच्याशी तिचं लग्न होणार होतं त्याने पळता पाय घेतला. हॉस्पिटला तर कधी आलच नाही, विचारले ही नाही. सगळं संपल या विचारात जीव द्यावा की काय करावं हाच विचार तिच्या मनात डोकाऊन गेला होता. पण स्वप्न पाहिली आहेत ती पूर्ण करण्याची जिद्द तिला उमेद देत होती. ती मुलगी आय़ुष्यात पुन्हा उभी राहीली आहे. किडनी निकामी झाल्यावर आय़ुष्यात फक्त हॉस्पिटल आणि घर या व्यतिरिक्त काही राहत नाही असे असले तरी जिद्दिने नोकरीला पुन्हा नव्याने सुरवात केली. अशा अवस्थेतही आपण आपल्या घरातल्याच्या जीवावर राहता कामा नये अशी तिच्या मनातली भावना खूप काही शिकवून गेली.
आपण जगत तर असतो पण त्या जगण्याला काही अर्थ नाही असे वाटत राहते. काही तरी हवं जे आपलं आहे... आपण त्याच्यासाठी जगतोय अशी भावना मनामध्ये येत राहते. निशा ला पहिल्यावर एकच भावना येते, की तिला आता जगायचं आहे स्वतःसाठी, तिच्या जगण्याचा अर्थ म्हणजेच तिचं ’स्वतःच आयुष्य’ आहे. तिची धडपड, तिची उमेद, तिचं स्वप्न, तिचे प्रयत्न सगळं काही आता स्वतः साठी आहे. आपणही आपलं आयुष्य स्वतः साठी जगले पाहिजे अगदी निशा सारखे. आत्महत्या करणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे जी करण्याची इच्छा मनात येते. अवघड असून आयुष्य सोपं करण्यासाठी हा मार्ग दिसतो. पण जगणं खूप सोपं आहे तो जगण्याचा आणि अनुभवण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला तर कुठे बिघडत. आयुष्यात काही गोष्टीना दुर्लक्ष केले की सोप्या होतात गोष्टी. त्रास ज्यांचा जास्त होतो त्यांना आपल्या विचारांत पण स्थान नाही द्यायचे, एखादी परिस्थिती आपल्याला संपविण्याआधी तिच्यावर स्वार होऊन लढायला शिकले पाहिजे. पळपुटेपणाने जाण्यापेक्षा आनंदी आय़ुष्यात जगायचं फक्त स्वतःसाठी...
काही वर्षापासून मी माझ्या आयुष्याला एक मंत्र लागू केलाय, प्रत्येक वाईट गोष्टीचा विचार करायला फक्त आणि फक्त चोविस तासच द्याचे. त्यानंतर त्या विचारांना, त्या गोष्टींना कुठेच स्थान नाही. नवा दिवस नवी सुरवात, काल घडलेल्या, केलेल्या विचारांनी आजचा दिवस खराब नाही करायचा. मनाशी हा मंत्र आता इतका पक्का झालाय की आता किती ही काही झाले तरी माझ्या कडे आत फक्त रात्रीचे बारा इतकाच वेळ आहे. या मंत्रामुळे झाले असे की, कमी वेळात निर्णय घेण्याची क्षमता वाढली आणि आणि उगाचे निगेटिव्ह विचारांमध्ये वेळ गेला नाही. सकारात्मक दृष्टीकोण हा आपल्याला कोणी देत नाही तो स्वतःमध्येच निर्माण करावा लागतो. स्वतःला सावरायला शिकले पाहिजे.
असं म्हणतात मरण जवळून पाहिल्यावर आपण जगायला शिकतो. मरण जवळ करण्यापेक्षा आपल्यातील वाईट विचारांना, त्रास देणाऱ्या वाईट लोकांना मनापासून श्रद्धांजली द्या आणि मोकळा श्वास घ्या, जगणं जवळ करा. ते बोलतात ना “ अपुन अपने मुड में दुनिया गयी भाड मैं” असं काहीसं विचारांत आणायचं आहे पुन्हा सुरवात करायची.
सगळी नाती भावनिक आणि
व्यावहारीक कशी आहेत याचा खरा अर्थ लागला की आपण जगायला शिकतो....
स्वतः फक्त आपणच आपले आहोत हे जेव्हा कळायला लागते तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जगायला शिकतो....
सत्य जे आहे मग ते वाईट असो वा चांगले ते मान्य करुन त्याच्या अधिन न जाता पुन्हा नव्याने सुरवात करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जगायला शिकतो....
आयुष्य एकच आहे ते कोणासाठी आणि कोणासोबत घालवायचे हे ठरले की आपण खऱ्या अर्थाने जगायला शिकतो....
लोकांवर विश्वार ठेवावा पण तो आंधळा नसावा, एखाद्याशी पटलं तर कनेक्ट व्हावं नाहीतर सरळ डिसकनेक्ट हे जेव्हा कळायला लागतं तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जगायला शिकतो....
अगदी महत्वाची आणि आपल्याला आनंदी ठेवणारी गोष्ट म्हणजे, काही लोकांना ना, विचारांना गोष्टींना जानिवपूर्वक दुर्लक्ष करायला ज्या क्षणाला शिकतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जगायला लागतो.....
#Life #SaveYourSelf
- अर्चना सोंडे
-
८१०८१०५२२९ स्वतः फक्त आपणच आपले आहोत हे जेव्हा कळायला लागते तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जगायला शिकतो....
सत्य जे आहे मग ते वाईट असो वा चांगले ते मान्य करुन त्याच्या अधिन न जाता पुन्हा नव्याने सुरवात करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जगायला शिकतो....
आयुष्य एकच आहे ते कोणासाठी आणि कोणासोबत घालवायचे हे ठरले की आपण खऱ्या अर्थाने जगायला शिकतो....
लोकांवर विश्वार ठेवावा पण तो आंधळा नसावा, एखाद्याशी पटलं तर कनेक्ट व्हावं नाहीतर सरळ डिसकनेक्ट हे जेव्हा कळायला लागतं तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जगायला शिकतो....
अगदी महत्वाची आणि आपल्याला आनंदी ठेवणारी गोष्ट म्हणजे, काही लोकांना ना, विचारांना गोष्टींना जानिवपूर्वक दुर्लक्ष करायला ज्या क्षणाला शिकतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जगायला लागतो.....
#Life #SaveYourSelf
- अर्चना सोंडे
No comments:
Post a Comment