Monday, May 23, 2016

अखेर खेळ संपला....

आज पासून त्याची वाट पाहणं थांबलं... तो खूप सहजपणे बोलला .. मला कोणीतरी दुसरी मुलगी आवडते.... झाला ना खेळ खल्लास.... 
खरं तर खूप दिवसानंतर मनाची शांती झाली... माझी वाट बघणं थांबणार होतं आता.... त्याला काही फिल झालं असेल की नाही महित नाही ... पण आज खूप वर्षानंतर आई ला घट्ट मिठी मारुन रडायाची इच्छा झाली. आजही एकटचं स्वतःला सावरावं लागलं. शेवटी काय कोणाला कितीही जीव लावला की असचं होतं . जीव ओवाळून टाकायला पण मन लागतं पण त्याला काय कळणार म्हणा जीव लावणं काय असतं....
का माहित नाही जगात हा एकमेव माणूस असेल की ज्याच्यासाठी माझ्या ओठांवर कधीच शिवी आली नाही की, यार त्याचं वाईट व्हावं असं नाही वाटलं.... आज मला म्हणाला ‘तुला काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाह’... चटकन पाणी आलं त्याचं हे वाक्य एकून ... माझा माज आजून त्याने तर पाहिलाच नव्हता... कोणत्याही मुलाला समोर कधी उभा केला नाही, कोणाची चांगलीच उतरवायची माझ्याकडून शिकावं आणि कधी कोणाच्या बापाचा एकून घेतलं नव्ह्तं .. पण हा ‘हिरो’ एकमेव जो मला सांगतोय .... असो... माझी चूकी फक्त आणि फक्त प्रेमच दाखवलं मी त्याला... कसा कळणार त्याला तरी मी कोण? (त्याच्यासाथी अर्थात मी फालतू आहे) .  आज एकच दुखः झालं त्याला मी तेव्हाही त्याच्या सुखासाठीच सोडलं आणि आज ही कायमचं विचार सोडला तेही त्याच्या सुखासाठी पण त्याला तेव्हाही नाही कळाले माझे वागणे आणि आजही....  

असो तु हॅपी मी हॅपी.... 

Bye @abhI Forever 



            

1 comment:

  1. सो sad नाही .... आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला आपल्या प्रेमाची किंमतच नसते मुळात आणि आपण मृगजळासारखं त्याच्या मागे धावत असतो ... शेवटी कितीही जीव लावला तरी ती व्यक्ती आयुष्यात आली तशी निघून जाते .... जाताना दुःख ओजळीत टाकून निघून जाते मात्र ... खूप छान लिहिता तुम्ही ...

    ReplyDelete