Thursday, October 15, 2015

टर्निंग... ट्वेन्टि सेव्हन

सोळांवं वरिस धोक्याचं जसं म्हणतात ना... तसंच सत्ताविसावं वरिस मौक्याचं म्हणजेच निर्णयाचं म्हणायला काहीच हरकत नाही. हा आपल्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा... काही मुलींची लग्न झालेली असतात , तर काही घर-संसार, नवरा-मुलं यात बिझी असतात... तर काही करियर च्या टप्प्यावर असतात म्हणजे माझ्यासारख्या, करियरचा महत्वाचा टप्पा आयुष्यभर तर चालूच राहणार आहे. आता त्याच बरोबर स्वतःचा कुटुंब असण्याचा टप्पा आलाच आहे याची जाणीव होतेय मला हळू हळू.  लग्न करुन सेटल व्हावं असं बरेचदा मनात आलं... पण लग्न करुनच सेटल होतात का ? एकटं ही राहूच शकतो की आपण मस्त असा माझा विचार गेल्या वर्षभरातला... पण आता माझेच विचार मलाच पटत नाहीयेत असं झालंय. खरचं... लग्न, कुटुंब, नवरा... यात पण काहीतरी सुख आहे ज्याची उणीव करियर मध्ये नाही भरुण निघणार... याच वयात येणारी ही स्ट्रॉन्ग फिलींग. माझ्या बऱ्याच मैत्रीणीची लग्न झाली आहे. काही ना तर बेबी पण आहे. नुकताच घडलेला प्रसंग म्हणजे माझी मैत्रीण दिपीकाला मुलगी झाली म्हणून तिला पाहण्यासाठी गेले. ते बाळ फक्त दहा दिवसाचं होत, नाजुक असं ते बाळ पाहताना अंगावर शहारे आले होते. तिचे ते छोटे छॊटे हाथ.. छोटे छोटे डोळे ...सगळं पाहताना कधीच न आलेला विचार मनात डोकाऊन गेलाच... माझं बाळ कधी असणार असं, मलाही आई व्हायचं आहे. यार काय भारी फिलिंग असतील ना या... मला पण हव्या आहेत अशा फिलिंग... हा त्या दिवशी माझ्या मनात आलेला विचार अगदिच वेगळा होता.. आता पर्यतची जी अर्चन जी फक्त आणि फक्त करियरचा विचार करायची अचानक असं का फ़िल करतेय. मीच माझा विचार करुन वेडी होतेय की काय असं झालं. माझ्या स्वतःतील बदल मला कळायला लागले होते आत..आणि त्यामुळे आणखी चिड चिड वाढायला लागाली. मी खूपच किरकिरी झालेय की काय असंच जाणवू लागलेय. मन तर जामच घाबरलेलं आहे. स्वतःच मनाची समजूत काढतेय दोन दिवसापासून मी... वयच वाढलंय बाकी काही नाही. हाहाहा...  

टर्निंग २५... तेव्हा तर जाम धम्माल केली. सॉलिड मज्जा, मस्ती ,मित्र मैत्रिण आणि मला मिळालेले २५ व्या वाढदिवसाचे २५ गिफ्ट्स... सगळ्यात भारी साजरा झालेला माझा वाढदिवस. गेल्या वर्षी  काही वाटलं नाही इतकं नॉर्मलच वाढदिवस केला. पण आता काय झालय कुणास ठावून ... अचानक आपण मोठं झाले आहोत... आपण अजून काहीच नाही आहोत. अजूनही शून्यातच आहोत... मन उदास करणारे विचार हळू हळू का होईना डोक्यात घर करायला लागले आहेत. जसं काय २७ वय म्हणजे जबाबदाऱ्याचं ओझं घेण्याची वेळ आली आहे असं सांगणारं. एक मुलगी म्हणून जामच कठीन काळ वाटायला लागला आहे. गेल्या वर्षभरात नियतीने बरचं काही शिकवलं... माझ्या मनाची होणारी ही घालमेल माझ्यासारख्या सेम वय असलेल्या मुलीमध्ये पण होत असेल का हा प्रश्न मला नेहमीच पडतो. मनात कसलीतरी भिती आहे ... लग्नाची , करियरची , भविष्याची ... या सगळ्याचे निर्णय या वयातच घ्यायचे आहे. एकदम सिरियस होऊन प्रत्येक पाऊल उचलायचं आहे. वय सत्तावीस म्हणजे किती मोठी नवरी आहे असं मीच बोलायचे... आता मी सत्तावीसचे झालेय आणि कधीतरी मी सुद्धा लग्न करणारच आहे.. श्या मला पण असंच बोलणार असतील ना लोकं... सगळं काही बोर आहे च्यायला.. मला कंटाळा आलाय माझ्या या वर्षीच्या वाढदिवसाचा... पण काय आहे यार नॉर्मल तर जगायचं आहेच... चेहऱ्यावर हसू ठेवून दिवस धकलायचा तर आहेच की.... 

खरंतर जसं जसं वय वाढलं आहे  मनआपलं माणूस शोधतयं  पण मिळत नाहीये... कधी मिळणार काय माहित .. हा माझा माणूसज्या सोबत हक्काने माझा वाढदिवस पुढील वर्षी प्लॅन करेन. पुढच्या वर्षीच्या वाढदिवसाला नक्की असेल असा कोणीतरी माझ्यासोबत जो माझ्या सगळ्याच प्रश्नाची उत्तर म्हणून माझ्या सोबत असेल. 


बघूया गमंतच या वयाची.... लवकरच पुढील लिहीन.... 


No comments:

Post a Comment