गेल्या काही दशकांत मानवी जीवनात यंत्रांचा वापर खूप वाढलेला आपल्याला दिसतो. यात माहिती आणि मनोरंजनासाठीची यंत्रे खूपच वाढली आहेत. विशेषत: गेल्या दोन दशकात यांचे प्रमाण जाणवण्याइतपत वाढ झाली आहे. एकूणच मानवी जीवन तंत्रज्ञानाभिमुख झाले आहे. किशोरवयीन मुले आणि मुंबईतील नव- माध्यमे हा विषय संशोधकाने संशोधनासाठी निवडण्याचे प्रयोजन असे की, सद्यसमाज तंत्रज्ञानाभिमुख होत चालला आहे. व्यक्तीच्या आयुष्यात यांत्रिक वस्तूंना अनन्यसाधारण महत्त्व आल्याचे निदर्शनास येते. उदाहरणार्थ मोबाईल फोन,संगणक इ.
आपल्या दैनंदिन जीवनाचा अपरिहार्य भाग म्हणजे माध्यम ही माध्यमे मानवी इतिहासातील एक अद्ययावत व फारच नजीकच्या काळातील क्रांतीकारक घटना असून विश्वातले भौगोलिक अंतर कमी करून, जग परस्परांच्या अगदी जवळ आणून सोडणारी क्रांती या नव-माध्यमांमुळे आणि त्यामागील तंत्रज्ञानामुळे घडून आलेली आहे. नजीकच्याच काळात या क्षेत्रात आलेल्या डिजीटल तंत्रज्ञानामुळे तर याहून अभूतपूर्व असे नवेच जग निर्माण होत आहे. असंख्य प्रकारची संकेतस्थळे आणि वेगवेगळ्या सोशल नेटवर्कींग साईट (सामाजिक वैश्विक जाळे) या सर्व संमिश्र माध्यमातून उद्भवणारी परिस्थिती हे आजचे तंत्रज्ञान आपल्याला लवकरच मागास वाटावे एवढे बदल घडवणार आहेत. माध्यमांच्या युगाकडून आपण विशेषीकृत उपयोगाच्या अशा नव-माध्यमाकडे चाललो आहोत.
दूरदर्शन संच, इंटरनेट आणि मुले :
आपण घरामध्ये टीव्ही पाहताना ठराविक गोष्टी पाहाव्यात, काही गोष्टी पाहू नयेत असे काही अलिखित नियमच असतात. तो संकेत बऱ्याच घरांत पाळला जातो; पण टीव्हीवरील कार्यक्रम पाहण्यावर ८० टक्के नियंत्रण असताना संगणकाबाबत मात्र ते पाच टक्के देखील नाही. मुलं संगणकावर काय करतात आणि पालकांचा त्यावर किती अंकुश आहे, याबाबत झालेल्या पाहणीनुसार संशोधकास असे वाटते की, ८५ टक्के पालक हे मुलांशी तोंडी करार करतात. म्हणजे वाईट गोष्टी बघू नयेत, त्याचा आपल्यावर वाईट परिणाम होतो अशा गोष्टी जर तु पाहिल्यास तर मी तुला शिक्षा करीन वगैरे, मुलंही पालकांना कबुलीजबाब देतात. वास्तविक जगातील ७० टक्के मुले संगणकावर सर्फिंग आणि चॅटिंग करण्यात आपला वेळ घालवतात, हे उघड झालं आहे. यामध्ये १२ ते १८ या वयोगटातील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. इंटरनेटवरून ५५ टक्के चॅटिंग केलं जातं, ५० टक्के संगीत, गाणी डाऊनलोड होतात.
दूरदर्शन संच,इंटरनेट आणि पालक :
संशोधकाच्या उपरोक्त मतानुसार मुलांचे पालक हे दूरदर्शन संचावर आपला वचक दाखवतात कारण, त्यांना या तंत्रज्ञानाविषयी माहिती असते त्यामुळे ते दूरदर्शन संचावर मुलांनी काय पाहावे काय नाही याविषयक दबाव आणू शकतात, नियंत्रण ठेवू शकतात परंतु संशोधकाने केलेल्या पाहणीनुसार ,पालक दूरदर्शन संचाविषयी परिचित असल्याने त्यांना माहित असते ,पण संगणकाविषयी जास्त ज्ञान नसल्याने मुले संगणकावर काय करतात त्याची त्यांना कल्पनाही नसते म्हणजे किमान २५% पालकांना संगणकाचे ज्ञान आहे तर ६५% पालक संगणक विश्वाशी परिचित नाही. त्यामुळे असे म्हणता येईल की आताची पिढीच डिजिटल युगातली असल्यामुळे ही पिढी जितक्या आत्मविश्वासानं संगणक हाताळते, तितका त्यांचा पालक वर्ग हाताळू शकत नाही. कारण त्यांच्या लहानपणी इंटरनेट हा प्रकारच मुळी अस्तित्वात नव्हता.त्यामुळे मुले संगणकावर काय करतात याबाबत त्यांना काहीही माहिती नाही असे संशोधनकर्त्यास आपल्या संशोधनातून जाणवले आहे.
इंटरनेटने प्रचंड प्रगती केली आहे आणि त्याचे फायदे काय आहेत हे सर्व किशोरवयीन मुलांना माहीत आहे . आताची मुलं डिजिटल वातावरणातच वाढतात. शाळेपासूनच त्यांना संगणकाची ओळख होते त्यामुळे संगणक ही यशाची गुरुकिल्ली समजली जाते, याची १२ ते १६ वयोगट असणाऱ्या मुलांच्या जवळपास प्रत्येक घर आज या डिजिटल युगाशी जोडलं गेलं आहे. उच्च वर्गातील बहुतांश घरांत संगणक असतोच आणि मध्यम वर्गातील ज्यांच्या घरात संगणक नाही वा इंटरनेट उपलब्ध नाही, अशी मुले सायबर कॅफेमध्ये जाऊन संगणक युगाशी स्वतःला जोडतात. आताची पिढीच डिजिटल युगातली असल्यामुळे ही पिढी जितक्या आत्मविश्वासानं संगणक हाताळते, तितका त्यांचा पालक वर्ग हाताळू शकत नाही. कारण त्यांच्या लहानपणी इंटरनेट हा प्रकारच मुळी अस्तित्वात नव्हता. त्यामुळेच आपली मुलं संगणक खूप छान वापरतात, हे पालकांना माहीत असतं. आता इंटरनेट मुळे सोशल साईट्स वापरण्याचा प्रभाव पण या किशोरवयीन मुलांवर पडला आहे. मग ही मुले उच्च वर्गातील असो वा मध्यम वर्गातील सोशल साईट्सचा काही प्रमाणात वापर करतात. संशोधकाने केलेल्या संशोधनावरून, उच्च वर्गातील मराठी आणि इंग्रजी माध्यम हे मध्यम वर्गाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या तुलनेत अधिक प्रमाणात इंटरनेटचा वापर करतात कारण,उच्च वर्गातील मुलांना घरीच इंटरनेट वापरता येत असल्याने त्यांचे प्रमाण जास्त आहे तर मध्यम वर्गातील मुलांच्या घरी संगणकच नसल्याने इंटरनेटचा वापर होतच नाही त्यांना शाळेमध्ये इंटरनेटची तोंड ओळख होते आणि सायबर कॅफे मध्ये जाऊन ते इंटरनेट हाताळतात.
आपल्या दैनंदिन जीवनाचा अपरिहार्य भाग म्हणजे माध्यम ही माध्यमे मानवी इतिहासातील एक अद्ययावत व फारच नजीकच्या काळातील क्रांतीकारक घटना असून विश्वातले भौगोलिक अंतर कमी करून, जग परस्परांच्या अगदी जवळ आणून सोडणारी क्रांती या नव-माध्यमांमुळे आणि त्यामागील तंत्रज्ञानामुळे घडून आलेली आहे. नजीकच्याच काळात या क्षेत्रात आलेल्या डिजीटल तंत्रज्ञानामुळे तर याहून अभूतपूर्व असे नवेच जग निर्माण होत आहे. असंख्य प्रकारची संकेतस्थळे आणि वेगवेगळ्या सोशल नेटवर्कींग साईट (सामाजिक वैश्विक जाळे) या सर्व संमिश्र माध्यमातून उद्भवणारी परिस्थिती हे आजचे तंत्रज्ञान आपल्याला लवकरच मागास वाटावे एवढे बदल घडवणार आहेत. माध्यमांच्या युगाकडून आपण विशेषीकृत उपयोगाच्या अशा नव-माध्यमाकडे चाललो आहोत.
दूरदर्शन संच, इंटरनेट आणि मुले :
आपण घरामध्ये टीव्ही पाहताना ठराविक गोष्टी पाहाव्यात, काही गोष्टी पाहू नयेत असे काही अलिखित नियमच असतात. तो संकेत बऱ्याच घरांत पाळला जातो; पण टीव्हीवरील कार्यक्रम पाहण्यावर ८० टक्के नियंत्रण असताना संगणकाबाबत मात्र ते पाच टक्के देखील नाही. मुलं संगणकावर काय करतात आणि पालकांचा त्यावर किती अंकुश आहे, याबाबत झालेल्या पाहणीनुसार संशोधकास असे वाटते की, ८५ टक्के पालक हे मुलांशी तोंडी करार करतात. म्हणजे वाईट गोष्टी बघू नयेत, त्याचा आपल्यावर वाईट परिणाम होतो अशा गोष्टी जर तु पाहिल्यास तर मी तुला शिक्षा करीन वगैरे, मुलंही पालकांना कबुलीजबाब देतात. वास्तविक जगातील ७० टक्के मुले संगणकावर सर्फिंग आणि चॅटिंग करण्यात आपला वेळ घालवतात, हे उघड झालं आहे. यामध्ये १२ ते १८ या वयोगटातील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. इंटरनेटवरून ५५ टक्के चॅटिंग केलं जातं, ५० टक्के संगीत, गाणी डाऊनलोड होतात.
दूरदर्शन संच,इंटरनेट आणि पालक :
संशोधकाच्या उपरोक्त मतानुसार मुलांचे पालक हे दूरदर्शन संचावर आपला वचक दाखवतात कारण, त्यांना या तंत्रज्ञानाविषयी माहिती असते त्यामुळे ते दूरदर्शन संचावर मुलांनी काय पाहावे काय नाही याविषयक दबाव आणू शकतात, नियंत्रण ठेवू शकतात परंतु संशोधकाने केलेल्या पाहणीनुसार ,पालक दूरदर्शन संचाविषयी परिचित असल्याने त्यांना माहित असते ,पण संगणकाविषयी जास्त ज्ञान नसल्याने मुले संगणकावर काय करतात त्याची त्यांना कल्पनाही नसते म्हणजे किमान २५% पालकांना संगणकाचे ज्ञान आहे तर ६५% पालक संगणक विश्वाशी परिचित नाही. त्यामुळे असे म्हणता येईल की आताची पिढीच डिजिटल युगातली असल्यामुळे ही पिढी जितक्या आत्मविश्वासानं संगणक हाताळते, तितका त्यांचा पालक वर्ग हाताळू शकत नाही. कारण त्यांच्या लहानपणी इंटरनेट हा प्रकारच मुळी अस्तित्वात नव्हता.त्यामुळे मुले संगणकावर काय करतात याबाबत त्यांना काहीही माहिती नाही असे संशोधनकर्त्यास आपल्या संशोधनातून जाणवले आहे.
इंटरनेटने प्रचंड प्रगती केली आहे आणि त्याचे फायदे काय आहेत हे सर्व किशोरवयीन मुलांना माहीत आहे . आताची मुलं डिजिटल वातावरणातच वाढतात. शाळेपासूनच त्यांना संगणकाची ओळख होते त्यामुळे संगणक ही यशाची गुरुकिल्ली समजली जाते, याची १२ ते १६ वयोगट असणाऱ्या मुलांच्या जवळपास प्रत्येक घर आज या डिजिटल युगाशी जोडलं गेलं आहे. उच्च वर्गातील बहुतांश घरांत संगणक असतोच आणि मध्यम वर्गातील ज्यांच्या घरात संगणक नाही वा इंटरनेट उपलब्ध नाही, अशी मुले सायबर कॅफेमध्ये जाऊन संगणक युगाशी स्वतःला जोडतात. आताची पिढीच डिजिटल युगातली असल्यामुळे ही पिढी जितक्या आत्मविश्वासानं संगणक हाताळते, तितका त्यांचा पालक वर्ग हाताळू शकत नाही. कारण त्यांच्या लहानपणी इंटरनेट हा प्रकारच मुळी अस्तित्वात नव्हता. त्यामुळेच आपली मुलं संगणक खूप छान वापरतात, हे पालकांना माहीत असतं. आता इंटरनेट मुळे सोशल साईट्स वापरण्याचा प्रभाव पण या किशोरवयीन मुलांवर पडला आहे. मग ही मुले उच्च वर्गातील असो वा मध्यम वर्गातील सोशल साईट्सचा काही प्रमाणात वापर करतात. संशोधकाने केलेल्या संशोधनावरून, उच्च वर्गातील मराठी आणि इंग्रजी माध्यम हे मध्यम वर्गाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या तुलनेत अधिक प्रमाणात इंटरनेटचा वापर करतात कारण,उच्च वर्गातील मुलांना घरीच इंटरनेट वापरता येत असल्याने त्यांचे प्रमाण जास्त आहे तर मध्यम वर्गातील मुलांच्या घरी संगणकच नसल्याने इंटरनेटचा वापर होतच नाही त्यांना शाळेमध्ये इंटरनेटची तोंड ओळख होते आणि सायबर कॅफे मध्ये जाऊन ते इंटरनेट हाताळतात.
No comments:
Post a Comment