Thursday, June 22, 2017

निसर्गांच्या कुशीत भंडारदरा ...

निसर्गांच्या कुशीत भंडारदरा ...

येरे येरे पावसा तुला देतो पैसा अशी काहीशी अवस्था आपली झाली आहे... जून महिना अर्धा संपत आला तरी पावसाने हवा तसा जोर धरलेला नाही, या पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतो. स्पेशल पावसाळी सहल कुठे कुठे जायचे याचे प्लॅनिंग ऑफिस, आपला आवडता कट्टा, वॉट्सऍप ग्रुप सगळीकडे सुरु झाले आहेत. अशा वेळी आता नक्की जायचं कुठे चांगला पर्याय नेहमीच आपण शोधत असतो. लोणावळा, खंडाळा, माळशेज, माथेरान, निरनिराळे धबधबे अशा विविध ठिकांणाची माहिती आपण गोळा करायला लागलो. असेच एक अविस्मरणीय स्थळ भंडारदरा म्हणजे निसर्गाच्या कुशीत जाण्याचा अनुभव आहे. या पावसाळ्यात नक्कीच जाऊन या...

निसर्गाची बदलती रुपं अगदीच जवळून पाहायची असेल तर सह्याद्री डोंगरदऱ्यांच्या कुशीत गेलेच पाहिजे. सभोवताली फक्त आणि फक्त निसर्ग आहे, कानांमध्ये वाऱ्याची झुळुक, हवेत गारवा, क्षणात काळे, क्षणात शुभ्र निळे होणारे आणि प्रवाहाच्या दिशेने जाणारे ढग पाहताना गम्मतच वाटते. स्वर्ग कसा असतो हे कोणालाच माहित नसते पण निसर्गाचे सौर्द्य पाहिले की आपण स्वर्गात आहोत की काय असं मनात नक्कीच येऊन जाते. असाच एक स्वर्ग आहे जो आपण या पावसाळ्यामध्ये पाहण्याचा प्लॅन करु शकतो. रिमझिम पाऊस, दाट धुकं, शुद्ध थंड हवा, हवेत दरवळणारा मातीचा सुंगध, सगळीकडे हिरवेगार गालिचे, उंच उंच डोंगरदऱ्या, मनसोक्त कोसळणारा धबधबा आहे ना सुंदर वर्णन... मन सैरावैरा पळत असेल तर नक्कीच अशा निसर्गाच्या सानिध्यात शांत होईल. चला तर मग भंडारदरा ....

भंडारदरा आहे कुठे ?
निसर्गसौंदर्यांसाठी प्रसिद्ध असलेले गाव भंडारदरा. हे महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात. भंडारदरा- शेंडी हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले एक आदिवासी कोळी महादेव जमातीचे गाव. पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू  भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा आहेत. येथे पाहण्यासाठी असणारे स्थळ कळसुबाई मंदिर, पांजरे बेट, अलंग, मलंग, कुलंग गड, उंबरदारा व्ह्युव पॉईंट, कोकणकडा, घाटनदेवी व्ह्युव पॉईंट, सांदन दरी, रिव्हर्स वॉटर फॉल, अमृतेश्वर मंदिर, नान्ही वॉटर फॉल, विल्सन डॅम, कळसुबाई शिखर, रत्नागड, रंधा फॉल, रतनवाडी, घाटघर असे पर्याय आहेतच. या सर्व स्थळांवर पावसाळ्यात जाऊन मनसोक्त आनंद घेऊ शकतो. येथे सर्व स्थळ तुम्हाला माहित नसेल तर तेथील गावकरींना हा तुमचा गाईड म्हणून घेऊ शकता. त्यांच्याकडे वनपरिक्षेत्र वन्यजीव भंडारदरा कार्यालय, गाईड ओळखपत्र क्रमांक पहावा.
  
शेंडे गाव - एकदम खास स्थळ म्हणजे रात्रीच्या शांततेच काजवे पाहण्यासाठी भंडारदरा येथील शेंडे गाव प्रसिद्ध आहे. मुंबईकरांना काजव्यांचे आकर्षण कायमच असते. पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि पाऊस सुरुवात झाल्यावर जाऊ शकतो. पावसाळ्यात चांदण्या आणि चंद्र यांचं दर्शन दुर्मिळ असते. ढगांच्या आड त्यांचे दर्शन कमीच मिळते. यावेळी या काजव्यांची रोषणाई अधिक उठून दिसते. पूर्ण झाडावर विजेचा लखलखाट दिसतो. काजव्याचा मुख्य उद्देश हा आपल्या जोडीदाराला आकर्षित करुण घेणं आणि आपलं अन्न शोधणं हा असतो. आपल्या जोडीदारासोबत कायमस्वरुपी लक्षात राहावं असं काही तरी पाहायचे असेल तर नक्कीच जा काजवे दर्शन करायला. मे आणि जून महिन्यात या काजव्यांचे दर्शन होते. दिवसभर भटकंती करुन रात्री काजव्याचे दर्शन घेऊन परतीच्या वाटेवर निघू शकता.       
   
कळसुबाई शिखर –
ट्रेकींगचा विचार असेल तर हा पर्यांय आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वाधिक उंच शिखर “कळसुबाई”. कळसुबाई शिखराची उंची १६४६ किमी. पावसाळ्यातील ट्रेकिंगचा उत्तम पर्याय आणि गिर्यारोहकांचे पावसाळ्यातील आवडते ठिकाण. ढगांमध्ये हरवायचं असेल, हवेत उडायचं असेल, एक थरार, एक नवा अनुभव घ्यायचा असेल, काहीतरी साहसी आणि कायम लक्षात राहील असं करायचं असेल तर बेस्ट पर्याय हा आहे. हे शिखर भंडाऱ्यापासून सहा किमी अंतरावर आहे. बरी या गावातून या शिखरावर चढण्यासाठी सुरवात करावी लागते. मुंबईपासून १८० किमी आणि पुण्यापासून ८० किमी अंतरावर हे ठिकाण आहे.

कळसुबाई ते हरिश्चंद्रगड अभयारण्य-
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई ते हरिश्चंद्रगड पर्यंत पसरलेली निसर्गरम्यविलोभनीयहिरव्यागर्द वनराईचा गिरी शिखरांनी वेढलेल्या प्रवरामुळा ह्या नद्यांचे उगमस्थान असलेला जंगलपट्टा म्हणजेच कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य.

विल्सन फॉल -
पावसाळा म्हटले की धबधब्याचे आकर्षण सगळ्यांनाच असते. हा धबधबा ही तितकाच सुंदर आणि आकर्षक आहे. मोठा गोल आकाराचा असा गोलाकार धबधबा आहे. छत्रीसारख्या आकारामुळे त्याला अम्ब्रेला फॉल असेही बोलतात.

रंधा फॉल -
शेंडी या गावापासून १० किलोमीटर अंतरावर रंधा या गावात रंधा फॉल असून तो गावाच्या नावावरूनच रंधा फॉल म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात हा धबधबा अतिशय रौद्र रूप धारण करतो. पावसाळ्यात मुख्य धबधब्याच्या उजव्या बाजूने अजून एक धबधबा पहायला मिळतो. दोन्ही धबधबे पूर्ण क्षमतेने वाहत असताना पाहणे हा एक रोमांचित करणारा अनुभव आहे. या धबधब्याच्या जवळच एक देवीचे मंदिर आहे पावसाळ्यात ते पूर्णपणे पाण्याखाली जाते. पाहण्यासाठी छान पण भितीदायक असलेला धबधबा भंडाराचे मोठे आकर्षण बिंदू आहे.  

रतनवाडी-
बोटिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर भंडारदऱ्याहून रतनवाडी जाता येते. रतनवाडी येथे अमृतेश्वराचे पुरातन हेमाडपंथी मंदीर आहे. या मंदिरावरील दगडी नक्षीकाम अत्यंत सुबक आणि देखणे असून त्यात मुख्य गाभाऱ्यात एक शिवलिंग आहेपावसाळ्यात हे शिवलिंग पूर्णत: पाण्यामध्ये बुडालेले असते. रतनवाडी परिसरात अनेक धबधबे असून गळ्यातील हारासारखा दिसणारा 'नेकलेस फॉलहा विशेष लोकप्रिय आहे.

घाटघर -
शेंडी गावापासून २२ किमी अंतरावर घाटघर गाव. भंडारदरा धरणाच्या कडेकडेने घाटघरपर्यंत करावयाचा प्रवास निसर्गाच्या कुशीत जाण्यासारखा आहे. येथे कोकणकडा अतिशय प्रसिद्ध असून इथून कोकण आणि सह्याद्री पर्वताचे आकर्षण आहे. हिरवाईने नटलेला परिसर, धबधबा, धुक्यात हरवलेला रस्ता, सगळं मन प्रसन्न करणारे आहे. घाटघरला येथे खूप पाऊस पडतो म्हणून यास नगर जिल्ह्याचे चेरापुंजी असे म्हणतात.

जेवणाची सोय- अमृतेश्वर मध्ये छोटी छोटी हॉटेल्स उपलब्ध आहेत. घरगुती आणि रुचकर जेवण मिळते. नगरची शेव भाजी आणि वाग्यांचे भरीत, गावठी कोंबडी यांचा मनसोक्त आनंद घेता येतो. तसेच एमटीडीसीचे हॉटेल राहण्यासाठी भंडारदरा येथे आहे.

अर्चना सोंडे – ८१०८१०५२२९ 
More Photos 





Thursday, June 15, 2017

शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यात “दिवेआगर”


शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यात “दिवेआगर”

सध्या उकाडयाने खूप हैराण झाले आहेत सगळेच, गावाकडे गेलेली मंडळी आता परतीच्या वाटेवर आहेत. खूप उन आहे म्हणून काही लोकांनी फिरायला जाण्यापेक्षा घरीच थांबणे पसंत केले आहे. गाव नसलेल्यांना तर काही ऑप्शनच नसतो घरी राहण्याव्यतिरिक्त, तरी सुद्धा काही भटकंती काही प्लॅन करायचा असेल तर मुंबई जवळची उत्तम जागा ‘दिवेआगर’, अगदी स्वतःच्या गावी असल्याचा फिल घ्यायचा असेल तरी अजूनही वेळ गेली नाही नक्की जाऊन या...
काय आहे दिवेआगर -
’दिवेआगर’चा सुर्यास्त हा अप्रतिम असतो. “दिवेआगर” हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातले एक गाव. छोटुसं ३,८४० लोकसंख्या असलेले गाव. या गावाला पर्यटन स्थळ म्हणून ओळख मिळाली ती येथे असणाऱ्या स्वयंभू सोन्याच्या गणपती मंदिरामुळे. या गणपती मंदिराची स्टोरी तर अनोखीच आहे. दिवेआगरचे मुख्य आकर्षण म्हणजे सुवर्णगणेश मंदिर, या मंदिराचा इतिहास म्हणजे, मंदिराजवळ नारळी-पोफळीच्या बागेत जमिनीखाली खणताना एक तांब्याच्या पेटीत गणेशाचा सोन्याचा मुखवटा सापडला. हा मुखवटा गणेशमंदिराच्या विश्वस्तांकडे सोपविण्यात आला. नंतर त्याची स्थापना मंदिरामध्ये करण्यात आली. काही वर्षापूर्वी या सोन्याच्या मुखवट्याची चोरी झाली. पण आता तशीच सोन्याची गणेश मुखवटा असलेली मूर्ती स्थापित केली आहे. अतिशय रेखीव असणारे रुपनारायण मंदिर आणि तेथे असणारे पाण्याचे मोठे कुंड पाहण्यासारखे आहे. शांत समुद्रकिनारा सगळ्यांचा आवडता असतो. हीच शांतता येथील स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यावर आपल्याला मिळते.
गणपती मंदिर

दिवेआगरच्या इतिहासात डोकावतांना...
फारशी सन शुहुर मेरा- १००० ते १००८ या काळातील बुर्हाण निजामशहा तिसरा याने केलेल्या या शिलालेखात ८ ओळी अरबी तर १६ ओळी मराठी भाषेत आहेत. यात गावाचा उल्लेख ’दिवे’ असा आहे. दक्षिण श्रीवर्धन परगणा, पश्चिमेस समुद्र तर उत्तरेस परगणे दण्डा, वाटेत दिघी तरीचा मार्ग अशा दिवेआगरच्या चतुःसीमा या निजामशाही शिलालेखात सांगितल्या आहेत.
दिवेआगर इतिहास

मुंबई ते दिवेआगर प्रवास
मुंबईपासून दिवेआगर ४ तास, १९० किलोमीटर. मुंबई-पनवेल-पेण-वडखळ-दिवेआगर असा प्रवास. कारने किंवा बाईकने लॉन्ग ड्राईव्ह करायचा असेल तर हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याचा. शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि दिवेआगर हे तिन्ही ठिकाण जवळ जवळ असल्याने येथे जाण्याची मज्जा काही औरच आहे.

राहण्याची खाण्याची सोय
बोर्ली गावानंतर रस्ता सुरु होतो तो दिवेआगरचा मग दिवेआगर कोळीवाडा, ग्रामपंचायत दिवेआगर, येथील वस्तीतील छोटी छोटी घरे, तसेच पर्यटक वाढत असल्याने काही हॉटेल्स आहेत. राहण्याची आणि खाण्याची घरगुती सोय असे प्रत्येक घराबाहेरील मोठे बोर्ड्स लक्ष वेधून घेतात. आमचे लक्ष वेधून घेतले ते, आमच्या अतिथीसाठी...‘धनश्री कॉटेज-निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची व जेवणाची उत्तम सोय’ या ओळींनी. तुम्हाला स्वतःच्या गावी आल्याचा फिल घ्यायचा असेल तर घरगुती सोयीसाठी प्रसिध्द असणारे, अतिशय मनमिळाऊ आणि आपण आपल्या हक्काच्या घरी आहोत अशी काळजी घेणारे कृष्णकांत तोडणकर यांच्या घनश्री कॉटेजमध्ये नक्कीच जाऊ शकतो. तिथला वैभव नावाचा मुलगा २३ वर्षाचा होता. येणाऱ्या पाहुण्याची आपुलकीने काळजी घेण्याची त्याची धडपड आश्चर्य करणारी होती. छोटासा वैभव जेवण बनविण्यात सुगरण आहे म्हटलं तरी चालेल. त्याच्या हातचे चिकन, मासे, सुक्या मच्छीचे कालवण यावर ताव मारताना फक्त “अरे वैभव मस्त झालंय” असं म्हटलं तरी थोडासा लाजून थॅक्स म्हणणारा वैभव खूपच गोड वाटतो. आपण त्याच्या घरातील एक आहोत अशीच आपली आपुलकीने काळजी घेतली जाते. त्यामुळे आपण आपल्या गावीच आलो असल्याचा फिल येतो.
आमच्या अतिथीसाठी...‘धनश्री कॉटेज-निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची व जेवणाची उत्तम सोय’ 

“दिवेआगर पासून जवळच कुठे भटकंती करायची असेल तर हरीहरेश्वर, श्रीवर्धन तसेच काही तासांच्या अंतरावर असणारे मुरुड जंजिरा ही फिरता येईल. तसेच किनाऱ्यालगत असणारे स्पोर्ट्स राईड ही करु शकतो. चला तर मग एक गावाकडची मज्जा अनुभवायला दिवेआगर जाऊया....
Divegara - Dhanashri Cottage -
Contact - Krishnakant Todakar - 9272722818

More Pics : 






अर्चना सोंडे
८१०८१०५२२९

Friday, May 19, 2017

जिंदा हु यार काफी है!

जिंदा हु यार काफी है!



जिंदा हु यार काफी है... अशी अवस्था आपल्या सभोवताली असणाऱ्या मित्र-मैत्रिणीमध्ये, सहकाऱ्यांमध्ये, शेजाऱ्यांमध्ये आजुबाजुला कुठे ना कुठे बघायला मिळतेच, कधी कधी तर स्वतःच असे फिल करत असतो. कालच एका नामांकित कंपनीत चांगल्या पोस्ट्वर काम करण्याऱ्या मित्राचा फेसबुकवर मेसेज आला. मै जा रहा हू, मुझे अब नही हो रहा. मी विचारला त्याला, अरे काय झाला. मग त्याचा मेसेज आला, मरणा चाहता हु, बस हो गया, लाईफ हेल हो गयी है. तो सिरियस होऊन खूप काही बोलत होता. मी मस्करीत घेऊन त्याला काही उत्तर नाही दिले. आता अचानक अतुल तापकीरची बातमी वाचल्यावर त्याच्या मेसेजची आठवण झाली आणि त्याला आधी विचारले, अबे जिंदा है क्या तु? मी त्याचा मेसेज आला तेव्हा भावनाशून्य होते. मस्करीत घेऊन विषय सोडून दिला होता. पण खरचं त्याने काही केले असतं तर, हा विचार मनात डोकाऊन अस्वस्थ करुन गेला.

हा किस्सा सांगण्याचं कारण आजकाल सगळ्या सुख-सोई असताना माणूस समाधानी दिसत नाहीये. मानसिक कुंचबना ही प्रत्येकाच्या आयुष्यात होतच आहे. प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स हे आहेतच, पैसा, वेळ, आजारपण, नाती, प्रेम, नोकरी या सगळ्याभोवती असणारे आपले जग... यातल्या काही गोष्टी आपल्याला मिळतात तर काही मिळत नाहीत. प्रेम आहे पण विश्वास नाही, पैसा आहे पण खर्च करण्यासाठी जीवाला जीव लावणारा माणूस नाही, जगायची इच्छा आहे पण शरीर साथ देत नाही, शिक्षण आहे पण नोकरी नाही... या पलिकडे उच्चभ्रू लोकांचे टेंशन्स तर वेगळेच असतात... काही जण धडपत जगतात, काही जण मरण हा एकमेव पर्याय निवडतात...    

भावनेच्या आहारी जाऊन जगण्य़ाचा कंटाळा आला की सोपा आणि आयुष्यातला सगळ्यात कठीण मार्ग दिसायला लागतो. तो म्हणजे “आत्महत्या”. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा वाईट काळ हा त्रासदायकच असतो. हा त्रास नकोसा वाटायला लागला, आयुष्याची सगळीचं गणीतं चुकली की , मग आपण म्हणतोच रागात.. यार आपण मरत का नाही? कंटाळा आलाय अशा जगण्याचा... नकोय हे लाईफ.... हे आपण सहजच म्हणत असतो.. पण मरणाशिवाय ज्याच्याकडे काहीच पर्याय नसतो ते काय विचार करत असतील ना?

माझी अगदी जवळची मैत्रिण आहे निशा, वय तीचं असेल साधारण २८ वर्षे, अचानक चक्कर आली म्हणून तिला आम्ही ऍडमिट केले हॉस्पिटला, तेथे तर काही रिपोर्ट्स मुळे कळाले की तिच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या आहेत. अचानक न ध्यानी ना मनी असताना स्वतः बद्दल इतकी मोठी गोष्ट कळवी तिला. सुन्न झालं होत सगळं, तिचे आई- बाबा, भाऊ याची अवस्था तर बघायलाच नको. मला काळ्जी होती तीची, आता कुठे ती स्वतःच्या आयुष्यात रमत होती, तीन महिन्याने लग्न करुन विदेशी सेटल होण्याची स्वप्न पाहणारी ती. नजरेसमोरुन झरझर तिचं बोलणं, हसणं मला दिसत होतं. असं कसं काय होऊ शकते कोणासोबत, किडनी निकामी होणं हा तिच्या नशीबाचा भाग म्हणून दुर्लक्ष करावं की होईल सगळं ठीक म्हणून विचार थांबवावा... आज या गोष्टीला सतरा महिने झाले, किडनी निकामी झाली हे एकण्याच्या आधीच ज्याच्याशी तिचं लग्न होणार होतं त्याने पळता पाय घेतला. हॉस्पिटला तर कधी आलच नाही, विचारले ही नाही. सगळं संपल या विचारात जीव द्यावा की काय करावं हाच विचार तिच्या मनात डोकाऊन गेला होता. पण स्वप्न पाहिली आहेत ती पूर्ण करण्याची जिद्द तिला उमेद देत होती.  ती मुलगी आय़ुष्यात पुन्हा उभी राहीली आहे. किडनी निकामी झाल्यावर आय़ुष्यात फक्त हॉस्पिटल आणि घर या व्यतिरिक्त काही राहत नाही असे असले तरी जिद्दिने नोकरीला पुन्हा नव्याने सुरवात केली. अशा अवस्थेतही आपण आपल्या घरातल्याच्या जीवावर राहता कामा नये अशी तिच्या मनातली भावना खूप काही शिकवून गेली.          

आपण जगत तर असतो पण त्या जगण्याला काही अर्थ नाही असे वाटत राहते. काही तरी हवं जे आपलं आहे... आपण त्याच्यासाठी जगतोय अशी भावना मनामध्ये येत राहते. निशा ला पहिल्यावर एकच भावना येते, की तिला आता जगायचं आहे स्वतःसाठी, तिच्या जगण्याचा अर्थ म्हणजेच तिचं ’स्वतःच आयुष्य’ आहे. तिची धडपड, तिची उमेद, तिचं स्वप्न, तिचे प्रयत्न सगळं काही आता स्वतः साठी आहे. आपणही आपलं आयुष्य स्वतः साठी जगले पाहिजे अगदी निशा सारखे. आत्महत्या करणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे जी करण्याची इच्छा मनात येते. अवघड असून आयुष्य सोपं करण्यासाठी हा मार्ग दिसतो. पण जगणं खूप सोपं आहे तो जगण्याचा आणि अनुभवण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला तर कुठे बिघडत. आयुष्यात काही गोष्टीना दुर्लक्ष केले की सोप्या होतात गोष्टी. त्रास ज्यांचा जास्त होतो त्यांना आपल्या विचारांत पण स्थान नाही द्यायचे, एखादी परिस्थिती आपल्याला संपविण्याआधी तिच्यावर स्वार होऊन लढायला शिकले पाहिजे. पळपुटेपणाने जाण्यापेक्षा आनंदी आय़ुष्यात जगायचं फक्त स्वतःसाठी...

काही वर्षापासून मी माझ्या आयुष्याला एक मंत्र लागू केलाय, प्रत्येक वाईट गोष्टीचा विचार करायला फक्त आणि फक्त चोविस तासच द्याचे. त्यानंतर त्या विचारांना, त्या गोष्टींना कुठेच स्थान नाही. नवा दिवस नवी सुरवात, काल घडलेल्या, केलेल्या विचारांनी आजचा दिवस खराब नाही करायचा. मनाशी हा मंत्र आता इतका पक्का झालाय की आता किती ही काही झाले तरी माझ्या कडे आत फक्त रात्रीचे बारा इतकाच वेळ आहे. या मंत्रामुळे झाले असे की, कमी वेळात निर्णय घेण्याची क्षमता वाढली आणि आणि उगाचे निगेटिव्ह विचारांमध्ये वेळ गेला नाही. सकारात्मक दृष्टीकोण हा आपल्याला कोणी देत नाही तो स्वतःमध्येच निर्माण करावा लागतो. स्वतःला सावरायला शिकले पाहिजे.

असं म्हणतात मरण जवळून पाहिल्यावर आपण जगायला शिकतो. मरण जवळ करण्यापेक्षा आपल्यातील वाईट विचारांना, त्रास देणाऱ्या वाईट लोकांना मनापासून श्रद्धांजली द्या आणि मोकळा श्वास घ्या, जगणं जवळ करा. ते बोलतात ना “ अपुन अपने मुड में दुनिया गयी भाड मैं” असं काहीसं विचारांत आणायचं आहे पुन्हा सुरवात करायची. 

सगळी नाती भावनिक आणि व्यावहारीक कशी आहेत याचा खरा अर्थ लागला की आपण जगायला शिकतो.... 
स्वतः फक्त आपणच आपले आहोत हे जेव्हा कळायला लागते तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जगायला शिकतो.... 
सत्य जे आहे मग ते वाईट असो वा चांगले ते मान्य करुन त्याच्या अधिन न जाता पुन्हा नव्याने सुरवात करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जगायला शिकतो.... 
आयुष्य एकच आहे ते कोणासाठी आणि कोणासोबत घालवायचे हे ठरले की आपण खऱ्या अर्थाने जगायला शिकतो.... 
लोकांवर विश्वार ठेवावा पण तो आंधळा नसावा, एखाद्याशी पटलं तर कनेक्ट व्हावं नाहीतर सरळ डिसकनेक्ट हे जेव्हा कळायला लागतं तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जगायला शिकतो....
अगदी महत्वाची आणि आपल्याला आनंदी ठेवणारी गोष्ट म्हणजे, काही लोकांना ना, विचारांना गोष्टींना जानिवपूर्वक दुर्लक्ष करायला ज्या क्षणाला शिकतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जगायला लागतो.....

#Life #SaveYourSelf 
- अर्चना सोंडे
-    ८१०८१०५२२९ 

Thursday, February 9, 2017

सध्या तो काय करतो?


yaar kaalu .. kaha hai tu ? 
माहित नाय़.... मिस करतेय त्याला.... 

ध्या तो काय करतोलग्न झालं त्याचं आणि विषय संपला आता... पुन्हा मागे वळून नाही पाहायचं त्याला, त्याच्या आठवणींना पण स्थान नाही माझ्या आयुष्यात. आपल्याला समजलाच नाही तो कधी... शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या एक फोन ची वाट पाहिली पण तसं काहीच झाले नाही. सॉरी ला पण काही अर्थ नव्ह्ता त्याच्या... का बोलतोय सॉरी हे सुद्धा मला नाही कळाले आजपर्यंत.... विषय संपताना डोक्यात चाललेले असे विचार....


मनात असणारी शांतता... पुन्हा पुन्हा त्याच्या शोध घेत राहते.... तो दिसावा.... त्याचा आवाज एकू 

यावा, त्याचा फोन यावा... त्याचा मेसेज यावा ... असं कधीतरी मनात डोकावते. माहित नाही 

आता तो कुठे आहे आणि कसा आहे. त्याची आठवण येते ... कितीही बिझी असले तरी डोक्यात 

एकदा तरी तो असतोच....

#MissU #MissUForever@bhi

Monday, February 6, 2017

रिफ्रेश करणारा हिवाळ्यातील माळशेज घाट


-    माळशेज ते जुन्नर प्रवास म्हणजे जन्नतच

पावसाळा आला की फिरण्याची ठिकाणे आपली ठरलेली असतात. लोणावळा, खंडाळा, खोपोली  माळशेज लॉंग ड्राईव्ह, चहा, भज्जी असा बेत तर सगळ्याच तरुणाईचा असतो. आता पावसाळा तर नाही आहे मग तरी पावसाळ्याचा विषय कशाला ना? खर तरं आज विषय आहे हिवाळ्यात फिरता येतील अशी ठिकाणे शोधण्याचा.

माळशेज – माळशेज हे पावसाळ्यात फिरण्यासाठीचे ठिकाण असले तरी त्यावेळेस तिकडे जाणे धोक्याचे असते. पावसाळ्यात जाण्याचं राहून गेलं असेल तर माळशेजचा छान असा अनुभव हिवाळ्यातही घेता येऊ शकतो. मस्त हिरवाईने नटलेलं माळशेज, हळुवार स्पर्श करणारा हवेतील गारवा तर मन वेडं करुन टाकतो. मुबंईच्या जवळ आसपास असल्याची जाणीव जरा देखील होत नाही. डोंगर दऱ्यातून रस्ता काढत घाट रस्ता बघण्याची मज्जा वेगळीच आहे. मुंबईच्या काही अंतरावर असलेले हे थंड हवेचे ठिकाण म्हटले तरी चालेल. शुद्ध हवा, मनाला निर्मळ करेल अशी शांतता, मन प्रसन्न होईल असे वातावरण हिवाळ्यात माळशेज घाटाचे असते.


प्लॅन करायचा कसा ?
मुंबई-कल्याण-मुरबाड मार्गे माळशेज जाता येते. सकाळी ७ वाजता मुंबईहून निघाल्यावर १० पर्यंत मुरबाड पर्यंत पोहोचतो आपण. सकाळचा नाश्ता करण्यासाठी मुरबाडला एसटी स्टॅन्ड समोर असलेले हॉटेल राम कृष्ण बेस्ट आहे. तुम्ही मिसळ खाण्याचे हौशी असाल तर मग काय मज्जाच आहे तुमची. हॉटेल राम कृष्णची मिसळ पाव मस्तच आहे. येथे भरपेट नाश्ता करायला काहीच हरकत नाही.
आता परत तयारी काही अंतरावरच असलेले माळशेज पाहण्याची. माळशेज घाट जसजसा जवळ येत जातो तसतसा हवेतील गारवा अधिकच जाणवायला लागतो. दोन्ही बाजूला असणारी झाडे, नागमोडी वळणे, समोर दिसणारे मोठमोठे डोंगर, स्वच्छ निळंशार ढग मन प्रफुल्लित करतात. माळशेज घाटात पहिले दर्शन होते ते गणपती बाप्पाचे. मूर्ती नाही तर काही दगडांचा आकारच आहे की तो पूर्ण असा दूरून पाहिल्यावर आपल्याला त्यात गणपतीची प्रतिकृती दिसते. आजूबाजूला फक्त डोंगर दऱ्या आहेत आणि मध्ये आपण आहोत असा भास होतो. अत्यंत निसर्गरम्य ठिकाणचा अनुभव आपल्याला हिवाळ्यात मनसोक्त घेता येतो. असे म्हणतात की या घाटाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. शिवाजी महाराजांच्या जन्माअगोदर जिजाऊमाता माहुलीगडावरुन माळशेजमार्गे शिवनेरीला गेल्याची ऎतिहासिक नोंद आहे. शिवनेरी गडावर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला हा गड या घाटामध्येच आहे.

माळशेजमध्ये एक दिवसासाठी येणारे पर्यंटक खूप असतात. त्यांना फ्रेश होण्यासाठी माळशेच्या जवळच असणारे एमटीडीसीचे हॉटेल. या घाटात असणारे एकमेव एमटीडिसीचे वॉशरुम म्हटले तरी चालेल.




माळशेजचा प्रवास एवढ्यापुरताच नाही तर खरी गम्मत आणि जन्नत तर पुढे आहे. माळशेज घाटाचा चढ चढल्यावर आता उतरत्या रस्त्याने उतरायचे आहे. माळशेजच्या पुढे ओतुरच्या दिशेने जायचं. थोड्या अंतरावर गेल्यावर आपण जन्नतमध्ये आहोत की काय असा प्रश्न पडतोच. कारण समोर असणारा निसर्ग वेडं लावणारा असतो. पिवळा- हिरवा- दिसणारा डोंगर परिसर, अथांग पसरलेले निळे निळे वैतरणा धरणाचे पाणी जणू ढग आणि पाणी एकत्रच आले आहे. क्षितीजाचा भास होतो. त्याच्या शेजारी असणारे छोटे गाव, गावातील काही भागात हिरवीगार शेती, तर काही ठिकाणी बैल जोड्याने शेतात काम करताना. हा असा निसर्ग आपल्यापैकी काहीजणांनी फक्त चित्रांमध्येच पहिला असेल. पण असं खरंच या ठिकाणांवर पाहायला मिळते. मन तृप्त करणारी जागा म्हणजे जन्नतच म्हणावी. डोळ्यात किती हा निसर्ग भरावा असं मनाला सारखं वाटतच राहते. दूर कुठेतरी एकटं जावं असं वाटणाऱ्यांनी तर नक्की या ठिकाणी एक लॉंग ड्राईव्ह करावा. मनाच्या कोपऱ्याला स्पर्श करणारा गारवा आणि हा निसर्ग पाहता पाहता कधी संध्याकाळ होईल ते कळणारच नाही.




आता घरी जायची घाई नको. भूक लागली असणारच ना, तर अजून पुढे जुन्नर पर्यंत येऊन जुन्नरची प्रसिद्ध मिसळ आपण खाणार नाही असं होणारचं नाही.  डी. पी खत्री यांची मिसळ आणि डी.पी खत्री कंदी पेढा जुन्नर मध्ये प्रसिद्ध आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या चौकात, समोरच खत्रींचे हॉटेल आहे. अगदी छोटीशी जागा आहे पण येथे मिळणारी मिसळ ला-जवाब, तर्री असलेली लाल भडक मिसळ तुम्ही कधीच खाल्ली नसेल. अफलातून असलेला कंदी पेढा. तिखट नंतर गोड झालेच पाहिजे असं काहीसं पेढ्यावर देखील मनसोक्त ताव मारता येईल. या मिसळची जिभेवर रेंगाळणारी चव तुम्हाला नक्कीच पुन्हा मुंबईहून जुन्नरकडे एकदा लॉंग ड्राईव्हला घेऊन जाईल. अशा एक दिवसाच्या रिफ्रेश प्रवासानंतर परतीच्या वाटेवर डोंगर दऱ्यातून सूर्यास्त पाहत पुन्हा मुंबई गाठायचे.



Tuesday, January 17, 2017

स्वतःच्या अंतरंगात पाहण्यास शिकवणारी साधना “विपश्यना”


क्षणा-क्षणात बदलणारे आपले मन, आता एक विचार तर नंतर एक विचार, मनाची घालमेल, मनात येणारा राग, मनात येणारे प्रेम, मनात येणारी प्रत्येक भावना नक्की येते तरी कुठून असा प्रश्न मला नेहमी पडायचा. आपलं असं का होतं आपलं मन आपल्या ताब्यात नाही का? मन धावेल त्या दिशेने धावायचं आणि आयुष्य जगायचं अशी आपल्या सवयच झालेली असते. फुलपाखराने जसं मनसोक्त अलगतच विहारावं तसचं आपलं मन चांगल्या – वाईट अनुभवाच्या विचारामध्ये अगदी अलगतच मनसोक्त विहरत असतं. मग कधी आपण खूप आनंदी असतो तर कधी आपण खूप दुःखी. मनाच्या या दोन अवस्थामध्ये आपण जगत असतो. आपल्याला लहानपनापासून सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात किंवा आपण शिकत असतोच. कसं जगायचं, कसं वागायचं? कुणी सांगेल का मला. असा नेमका प्रश्न हा प्रत्येकाच्या मनात डोकावत असतोच याचं  नेमकं उत्तर कोणाकडेच आपल्याला मिळत नाही. स्वतःच्या मनाचा शोध घेणारा मार्ग आपल्याला एका साधनेतून मिळतो आणि ती साधना म्हणजे ‘विपश्यना’.  

जगण्याची कला शिकवणारी विपश्यना साधना. “विपश्यना” हा शब्द जरी आपण ऐकून असलो तरी नेमकं यामध्ये असतं काय हे फार कमी लोकांना माहित असतं. भगवान बुध्दांनी सुमारे २५०० वर्षापूर्वी विपश्यना  साधनाचे पुन:संशोधन केले. ही एक प्राचीन आध्यात्मिक विद्या आहे. जगण्याची कला म्हणजे आयुष्यात येणारे सुख-दुःख आणि त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दॄष्टीकोन सकारात्मक असला की आयुष्य जगण्याचा आनंद आपल्याला घेता येतो. सकारात्मक दृष्टीकोन मिळतो ते स्वतःच्या अंत:रंगात डोकावल्यावर. जन्मापासून आपण डोळे उघडे ठेवून जे आपल्या दिसेल ते पाहत असतो. नेहमीच आपण बाह्य:जगाच्या सान्निध्यात असतो. अनुभवाने आपण सगळ्यांना समजण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण हेच आपण स्वतः बद्दल करत नाही. आपलं शरीर- आपलं मन काय करतयं, मनाची अवस्था, मनाची तगमग, आपल्याला विपश्यना मार्गातून जाणून घेता येतात.

‘विपश्यना’ म्हणजे आहे तरी काय ? दहा दिवस सगळ्या सुखसोयी पासून दूर, कुटुंबापासून लांब, स्मार्ट जगापासून दूर, मौन व्रत, साधी राहणीमान,  ऐकायला जरा अवघड आहे पण दहा दिवस फक्त स्वतःच्या सान्निध्यात राहायचं. प्रत्येकानं असा अनुभव आताच्या धावपळीच्या जगात घेतलाच पाहिजे. काही दिवसांपूर्वी नवीन वर्षाची सुरवात काहीतरी नव्याने करावी असे माझ्या मनात आले आणि आपण यंदा विपश्यनेला जाऊयात असं ठरवलं. स्वतः घेतलेला अनुभव हा विपश्यना बद्दल वाचण्यात आलेल्या अनुभवापेक्षा कितीतरी पटीने चांगला होता. स्वतःला नव्याने भेटल्याचा माझा अनुभव, गंज चढलेल्या एखाद्या वस्तूला पुन्हा लकाकी यावी तसं काहीसं आपल्या व्यक्तीमत्वाचं होतं. आपल्या मनाची वृत्ती बदलण्याचं कार्य जणू काही या विपश्यनेतून होतं. स्वतःतील बदल हे आपल्याला तर जाणवतातच पण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांकडूनही या बदलाला प्रतिक्रिया येऊ लागतात. 

आपल्या मनात येणारे चांगले वाईट विचार म्हणजे ते आपल्या मनाचे रोग असतात आणि हे मनाचे रोग बरे करण्यासाठी ’विपश्यना’ या साधनेची मदत होते. मनातील अशांतता, दुखः, अस्वस्थता, द्वेष, प्रेम, वासना या गोष्टी आपल्याला कधीकधी त्रास देत असतात. पण याच गोष्टी जर निर्मळ झाल्या तर आयुष्य जगायला सोपं होईल. प्रत्येक विकाराकडे पाहण्याचा दॄष्टीकोन म्हणजे आपण भोगण्याच्या भावनेने पाहत असतो आणि त्यातून आपल्याला त्रास होतो. पण या विकारांकडे आपण दॄष्टा भाव म्हणजे फक्त पाहण्याच्या भावनेने पाहिले तर आपण समानतेच्या भावनेत असतो ज्यामुळे आपल्याला त्रास होत नाही. या गोष्टी सांगताना आपल्याला आपल्याच शरीरामध्ये होणाऱ्या बदलावर लक्ष ठेवायला सांगतात. आपल्या डोक्यापासून पायापर्यंत क्षणात होणाऱ्या छोट्या छोट्या बदलांचे आपण निरिक्षण केले की आपल्या लक्षात येते की सर्व काही क्षणीक आहे, अनित्य आहे, अनिश्चित आहे. होणाऱ्या लहान मोठ्या बदलांकडे समता भावनेने पाहण्याचा दॄष्टीकोण विपश्यना मध्ये शिकवला जातो. उदा. माझ्या डोक्यामध्ये विचारांमुळे मुग्यां आल्यासारखे होत आहे. या गोष्टीचे आपण फक्त निरिक्षण करायचे आहे त्याच्याप्रती मनात राग किंवा प्रेम निर्माण नाही करायचे. अशा पूर्ण शरीरात होणाऱ्या कोणत्याही बदलाविषयी मनात कोणतीच नवी भावना निर्माण होऊ द्यायची नाही. हे शरीरात होणारे चांगल्या- वाईट बदल क्षणीक असल्याचे आपल्याला समजू लागते आणि आपला त्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोणही हळूहळू बदलू लागतो. आपल्या आयुष्याचंही तसंच आहे. येणारा आनंद जसा क्षणीक आहे तसेच दुखःही क्षणीकच आहे. फरक इतकाच की आनंद असेल तेव्हा आपण तो व्यक्त करतो खूपच आनंदी असतो. आणि जेव्हा दुखः असते तेव्हा आपण खूपच दुःखी होतो आणि मनाच्या विकारांना बळी पडतो. स्वतःच्या अंतर्मनात होणारे बदल जसे अनित्य असतात तसेच आयुष्यात येणारे चांगले वाईट क्षण अनित्य असतात फक्त त्याच्याकडे आपण समता भावनेने पाहिले पाहिजे. हे नेमकं आपल्याला ‘विपश्यना’ मध्ये शिकवले जाते.

दहा दिवसामध्ये स्वतःचा अहंकार, मी, माझे या सगळ्यातून हळू हळू आपण मुक्त होतो. काही गुणांचा स्विकार केला की मुक्तीपर्यंत पोहोचतो. हे गुण म्हणजे नैष्र्कम्य- जसे आहेतसे सुखसोयीचा स्विकार करणे, त्यागाची भावना मनात रुजली जावी. यासाठी दहा दिवस आपल्याला साधकासारखे राहवे लागते. शील – आपले शील भंग होईल असे काही बोलायचे नाही त्यासाठीच येथे दहा दिवस मौन व्रत असते. प्रयत्न – चांगला आणि सम्यक प्रयत्न मुक्तीमार्गाकडे घेऊन जातो. प्रज्ञा – प्रत्यक्ष ज्ञान ज्या गोष्टीतून मिळते म्हणजे स्व-अनुभवाने अनित्य, दुःख, राग, द्वेश, आत्मनिरिक्षण आपण दहा दिवसात प्रत्यक्षपणे करित असतो. सहिष्णुता – इतरांबद्दल मनात प्रेम आणि करुणा निर्माण करायची दहा दिवस समूहात राहत असताना चिडचीड न करता त्याला समजून घ्यावे. सत्य- यशाच्या मार्गावर चाललेले प्रत्येक पाऊल सत्यावर आधारित असले पाहिजे. अधिष्ठान- अधिष्ठान म्हणजे दृढसंकल्प. जेव्हा कोणी विपश्यना शिबिरात जातो तेव्हा दृढ संकल्प करतो की शिबिर पूर्ण करेल मध्येच सोडणार नाही. पंचशीलांचे पालन करण्याचा दॄढ संकल्प, आर्य मौन, अनुशासनात राहण्याचा संकल्प करतो. मैत्री- मैत्रीचा अर्थ शुद्ध आणि निःस्वार्थ प्रेम, इतरांच्या सुखाची कामना करायची. उपेक्षा- संवेदनांचा अनुभव करीत असताना तटस्थ राहतो. जेव्हा आपल्या शरीरात सूक्ष्म आणि प्रिय संवेदनांची अनुभूती होते तेव्हाही आपण तटस्थ राहतो. आयुष्याच्या प्रत्येक स्थितीत तो जाणतो की त्या क्षणाचा अनुभव अनित्य आहे जसा हा उत्पन्न झाला आहे तसा नष्ट होणार. अनुभव घेऊन तटस्थ राहतो उपेक्षा भाव आपण जगतो. दान – दान ही भावना अहंकार निर्माण करीत नाही. दुसऱ्यांना कोणत्याही रुपाने का होईना मदत करण्याची चेतना जागृत येथे होते. स्व-अनुभवाने समजायला लागतो की इतरांची सर्वात मोठी मदत तीच असते जी त्याला दुःख मुक्त करते.

अशा दहा गुणांचा स्विकार दहा दिवसाच्या शिबिरामध्ये केला जातो आणि आपण आपल्या व्यक्तिमत्वात बदल घडवित असतो. हे दहा गुण सगळ्यांनाच माहित असतात पण त्यांना स्वतःमध्ये विकसित करण्याची सुसंधी विपश्यना साधनेतून प्राप्त होते. जेव्हा या दहा गुणांचा मनापासून स्विकार करुन आपल्यात बदल घडतो तेव्हा आपण स्वतःला नव्याने भेटू लागतो.

विपश्यना साधना – दहा दिवसाचे शिबिर हे मोफत असते. कोणत्याही जातीचे, धर्माचे, समाजचे, या साधनेचा फायदा घेऊ शकतात. गरोदरपणाच्या काळात देखील या साधनेचा लाभ घेता येतो, आचार्य श्री. सत्यनारायणजी गोयंका यांच्या प्रवचनाने दहा दिवस आपल्याला विपश्यना ही साधना शिकवली जाते.

मुंबईतील काही विपश्यना साधना केंद्र –
धम्मविपुल विपश्यना केंद्र – सयाजी ऊ बा खिन मेमोरियल ट्रस्ट, पारासिक हिल, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई- ४०० ६१४
धम्मपतन – गोराई खाडी, एस्सल वर्ल्डजवळ, बोरीवली- पश्चिम मुंबई- ४०० ०९१       


     

Friday, July 22, 2016

तुझ्याचसाठी वेडी... काळूबाई


तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करण्याची संधी तु दिलीस त्यासाठी धन्यवाद... आता हे धन्यवाद वगैरे तुला नौटंकी वाटेल माझी.... पण तुला धन्यवाद म्हणायचे कारण काय माहित आहे का? की मी आतापर्यंत कोणत्याच मुलाच्या प्रेमाला होकार दिला नाही कारण मी माझ्या नजरेसमोरुन तुला कधीच जाउ दिले नाही. प्रेमाचा भास, प्रेमाचा शोध तुझ्यापर्यंतच येऊन केव्हांचा थांबला. तुझ्यात इतके गुंतत चालेय की माझ्यातच ‘तु’ आहे याचा भास होतो कधी कधी.. माझी मैत्रीण बोलते पण ...तु ना अभी के जैसे बात कर रही है... पण अभी तुला माहित आहे का ? ना टाइमपास साठी कोणाशी बोलले, ना कोणाशी टाईमपास करावा असं वाटलं... तुझ्यावर एकतर्फी प्रेम करताना खूप सुखी आणि समाधानी आहे मी.. यार कोणा फालतू मुलाला हो बोलून माझ्याच फिलिंगशी आणि मग त्याच्या फिंलींगशी खेळण्याची हिंमत माझ्यात कधी आली नाही. आणि येणार पण नाही... तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक वेळ हा माझ्यासाठी 1st Time Experience  होता... आणि आता परत मी दुसऱ्याबरोबर तेच पुन्हा फ़िलिंगस शेअर नाहीच करु शकत.. पुन्हा पुन्हा तुच आठवत राहणार आणि मग मलाच त्रास होणार.. म्हणून नकोच आता कोणी लाईफमध्ये.... मी एकटी आहे पण तुझ्या आठवणीसोबत... एकदम सुखी ....

यार तु ना कसला भारी आहेस ना माहित नाही तुला... आणि मला कळलय पण शब्दच नाहीत तुला ते सांगायला.... बस तेरे ना मैं भी मैने धुंड ली है अपनी खुशी.... लव्ह यु फॉरएव्हर कालू.... 


अकेले है तो क्या गम है.. तेरी यादें साथ है.... 

अभी तु ...


माझ्या भावना समजायला तुला कधीच वेळ नव्ह्ता ना...

ध्येच मला एकटं सोडून जाताना, एकदा तू विचार करायला हवा होतास.

तुझ्यासाठी जुनं असेल हे सगळं, माझ्या साठी तर हा नवा खेळ होता ना...





मिस यु Forever @Abhi