![]() |
माझ्या पुस्तकाचा ‘कव्हर फोटो’ |
काही हरवलं की
काहीतरी नवं मिळत,
काही वाट्या बंद
झाल्या की नव्या वाटा अपोआपच निघतात. तु गेलास पण त्या बदल्यात ना मला काही नवीन
मिळालं ना नवीन वाट.. खरतरं शोधलच नाही असं काही मी.... तु हरवलास माझ्या
आयुष्यातुन आणि सगळं गणितचं बिघडलं आयुष्याचं. प्रयत्न केला शंभर टक्के तुला
पुन्हा मिळविण्याचा पण तो प्रयत्न नेहमीप्रमाने असफलच झाला कारण आता तु तो नव्हतास
ना ज्याने काही क्षणासाठी का होईना माझ्यावर प्रेम केलं होत. असो पण तुझ्या
आठवणीसोबत राहण्याचा माझा निर्णय बदलला नाही मी... आणि या आठवणीतच मी
तुझ्याशी बोलते,
हसते, हवं ते करते... तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण
जगले होते आणि आता त्या आठणीच मला जगू देतायेत.
मी आपल्याबद्दल
लिहित असते ते तुझ्या पर्यंत पोहचतं की नाही माहित नाही पण जेव्हा पण लिहिते
तेव्हा खूप शांत वाटते मला.. तुझ्याशी खूप गप्पा मरल्याचा भास होतो. काही मिनिटांचा
असतो हा भास पण पुढचं लिखाण लिहिण्यापर्यंतचा पुरेसा असतो.
तुला गम्मत
माहित आहे का ?
मी जे काही
लिहिते फक्त तुझ्याशी बोलण्यासाठी... पण काही लोकं माझा ब्लॉग वाचतात आणि त्यांना
विशेष म्हणजे माझं लिखाण खूप आवडतं. मी असच लिहित राहावं. खूप लोकं बोले स्टोरी
खूप मस्त आहे... वाचताना खूप काही फिल होतं... पुस्तक लिहिण्याबद्दल पण सांगतात
मला.. माझा लिखाण ललित लेखनामध्ये येतं हे मला माझ्या वाचकाकडून कळालं... भारी ना
!
आता ठरलं रे... माझं आपल्या स्टोरीवर एक भारी मराठी लव्ह स्टोरी पुस्तक लिहायचंच.. आणि खर तरं आता
माझी तिच नवी ओळख असेल. एक लेखिका म्हणून....हीच आहे आता माझी नवी वाट जगण्याची...
"के ‘अभी’ दिल भरा नही" असं नाव सुचलयं मला... अजून काही नवीन सुचलं की दुसरं काहीतरी ठेवेन नाव... अजुन एक गम्मत माहित आहे का.. तुझ्या यावेळच्या वाढदिवसाला मी रिलिझ करेन नक्की..
सगळं काही फक्त तुझ्यासाठी... भारीवाला फिलींग आहे तुझ्यावर असच प्रेम करण्याचं...
मिस यु Forever @Abhi
No comments:
Post a Comment