Saturday, February 16, 2013

भेट ‘रत्नाकर मतकरी’ची...

पार्क- शिवाजींचा 
दर्जेदार लेखन कौशल्य असणारे साहित्यिक रत्नाकर मतकरी यांची ओळख तर सगळ्यांनाच ज्ञात आहे. नाटक, कथा, एकांकिका, बालनाट्य, ललित लेख, कादंबरी या साहित्यातून आपण त्यांना पाहिले आहे. इतकेच नाही तर ते एक उत्कृष्ट दिग्दर्शक ,निर्माते आणि चित्रकार देखील आहेत. आज यांची आठवण काढण्याचे कारण म्हणजे काल त्यांची भेट झाली चक्क शिवाजी पार्कमध्ये  ...    

संध्याकाळचा वेळ पार्कात घालवणे हे काय नवीन नाही मला सध्या सवयच झाली आहे . राज साहेबांच्या बंगल्यासमोरचा कट्टा म्हणजे माझी नेहमीची जागा, तिथेच बाजूला बसणारा एक जेष्ठ नागरिकांचा नेहमीचा ग्रुप, ओळखीचा नव्हता पण चेहरे ओळख असावी इतकाच... बरेचदा बहुतेक कलाकार फेरफटका मारताना इथे दिसतात, कलाकारांना पाहणं हे अगदीच नॉर्मल होतं कारण मिडीया मधले असल्यामुळे त्यांचं आकर्षण असं काहीच उरलंच नव्हतं. राज साहेब, अतुल परचुरे, प्रिया बापट, सचित पाटिल आणि बरेच चेहरे जे आपण टिव्हीवर पाहतो ते पार्कात मी पाहिलेच होते.  पण एखाद्या साहित्यिकाला भेटणं कधी झालंच नाही. नेमका आज तो क्षण समोर होता. 

आज या नेहमीच्या ग्रुप मध्ये एक गृहस्थ आले होते बऱ्याच वेळ ते छान गप्पा मारत होते... ते त्यांच्या मित्रांना कविता ऎकवत होते... मी एकटीच होते त्यामुळे  शांतपणे ते सगळं ऐकत होते, अचानक मला रत्नाकर मतकरीची आठवण आली...कारण बाजूला असणारे जेष्ठ नागरिक हे रत्नाकर मतकरीच असल्याचा भास मला झाला... मी लगेच  नेट वर त्यांचा फोटो सर्च मारला... तर पक्का वाटला की हे म्हणजे तेच आहेत.. थोडा वेळ विचार करुन मी त्यांच्याशी बोलायचा निर्णय घेतला. जर हे तेच असतील तर ही संधी आहे त्यांना भेटण्याची त्यांच्याशी बोलण्याची... आणि हे जर ते नसतील तर काय? तर..एक अनुभव घ्यायचा फक्त ... विचार झाला पक्का आणि भिडले थेट त्यांना ... सर तुम्ही रत्नाकर मतकरीच आहात का? कारण तुमचा चेहरा त्यांच्यासारखाच आहे मी खरंच आता नेटवर सुद्धा पाहिलं.  ते जरा हसले आणि म्हणाले, बेटा मी रत्नाकर मतकरी नाही... ते तर खूप मोठे आहेत वयाने आणि विचाराने... मी दिसतो त्यांच्यासारखा पण मी नाही ...थोडंसं वाईट वाटलं मला पण एका नवीन व्यक्तीची ओळखही मला झाली होती ते गृहस्थ होते माझ्या सोमैया कॉलेजमधील मनाली लोंढे या प्रोफेसरचे सासरे... त्यांच्याशी गप्पा मारताना स्वतःमधील आत्मविश्वास अधिकच वाढल्याची जाणीव झाली होती. त्यांच्याशी गप्पा छान झाल्या मी नेहमीच येते का असं त्यांनी मला विचारलं पण मी नेहमीच नाही तर फक्त गुरुवारी किंवा शुक्रवारीच येते असं म्हणाले ... नक्कीच पुन्हा भेटू तुला मी माझ्या ग्रुपशी ओळख करुन देतो म्हणाले... असं म्हणून त्यांनी निरोप घेतला, ह्या भेटीमध्ये ग्रेट असे काही नव्हते पण तरी माझा शिवाजी पार्कातला एकांत संपलेला होता.. परत एकदा नवीन विचारांना मार्ग मिळाला होता...ही भेट रत्नाकर मतकरींशी नव्हती...पण त्यांच्या एखाद्या पुस्तकामध्ये शोभावी अशीच...आगळी वेगळी...                    

Tuesday, February 12, 2013

टर्निंग पॉंईट ऑफ लाईफ...


टर्निंग पॉंईट ऑफ लाईफ
टर्निंग पॉंईट हा प्रत्येकांच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच. नोकरी, आई-बाबा, मित्र मैत्रिण सगळ्याबरोबर सुखात जगत असताना नेमकं आपण एका नवीन नात्यात गुंफतो. प्रेम, भावना, आपलं माणूस या सगळ्या कल्पणांना पंख मिळण्याचं हे वय ... आणि मग या पंखाना बळ येते ते म्हणजे तो’ किंवा ‘ती’ आयुष्यात आल्यावर. मग सुरु होतो आपल्या स्वतःच्या आयुष्याचा प्रवास ... आयुष्यात घेतलेले निर्णय हसवता हसवता कधी रडवू लागतात हे कळतच नाही. प्रत्येक वेळी भावनेच्या भरात घेतलेले निर्णय बरोबर असतोच असे नसले तरी आपल्या सुखाचा आणि दुखांचा अंदाज घेता येत नाही हे मात्र खरं आहे.

प्रेमात पडण्याचं वय नसतं असं कितीही म्हटले तरी, प्रेमात पडून प्रेमाबद्दल सिरियस होण्याचं वय असतं हे तितकच खरं आहे. आपल्या आयुष्यातही असंच होतं. प्रत्येकजण आयुष्याच्या एका वळणावर येऊन लाईफ एनजॉय करताना खरं प्रेमाच्या शोधत तर असतातच, नशीबाने काहीना मिळते तर काहीना आपला शोध चालूच ठेवावा लागतो. आणि प्रेम काय असं शोधून नायं मिळत ना... अगदी मनापासून होत कधीतरी एकदाच... आजच्या काळात प्रेमप्रकरण असणं ही दुर्मीळ गोष्ट राहिलेली नाही. नवीन मित्र किंवा मैत्रिण झाली की प्रत्येकाचा पहिला एकच प्रश्न असतो..तुझा बीफ जीफ आहे का? काही जण प्रेमात पडतात, धडपडतात, पुन्हा माणसं जोडतात, नव्या नात्यात नव्याने जगतात. जुनी नाती तुटली असली तरी नवी नाती मनाने जपण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं आपल्या आजूबाजूला होत असतं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम जडण्याआधी दुसर्‍या कुणावर तरी प्रेम जडलेलं होतं, ही भावना असुरक्षितता निर्माण करणारी असू शकते, पण भावनेला आपण नको इतकं महत्त्व देतो आणि आपलं असणारं प्रेम गमावतो.

आज ‘ती’ने तीच्या आयुष्यातील तो पण  असाच गमवला, त्याच्या  नात्यातली विश्वासहार्यता संपली म्हणून नातं संपलं... ती
 त्याच्याबरोबर प्रेमाचं नातं जगायला शिकली. प्रेमात पडणं आणि काहीतरी फिल करणं हे सगळं त्याच्यासोबतच अनुभवलं. तिला तिचं आयुष्य, सुख त्याच्याबरोबर राहण्यात मिळत होतं. प्रत्येक क्षणी त्याची सोबत असावी असंच वाटलं तिला, तिच्या हसण्याचं कारण फक्त तोच असावा... असं अगदी आनंदी आयुष्य जगत असताना नातं तुटते ते प्रेम आहे की नाही हे स्पष्ट करण्यावरुन, पण एकमेकांच्या भावना त्यांना कधीच समजल्या नाहीत, ज्या प्रेमाची सुरवात झाली होती ते प्रेम हरवलं ते त्यांच्यात होणाऱ्या रोजच्या भांडणामध्ये... तिच्याकडून झालेल्या चुका त्याने प्रेमाने माफ कराव्या आणि त्याने एखादी चूक केली की उगाच रागावून बसायचं असं मुद्दाम तिचा हट्ट. पण यावेळी ‘त्या’ची मोठी चूक होती म्हणून ‘ती’ खरचं रागवते पण ‘तो’ समजूत काढण्यासाठी कधीच परतला नाही... त्याला ‘ती’ समजून घेण्यास कमी पडली की ‘तो’च तिला समजू शकला नाही हा मला आजही पडलेला निरुत्तरीत प्रश्न. 

अशी प्रेमाबद्दलची उदाहरण आपल्याला नेहमीच आजूबाजूला दिसत असतात. पण ‘नात्यां’चा खरा अर्थ ज्यांना उलघडतो ते नक्कीच आपल्या नात्याचा अभिमान करुन ते टिकवण्याचा आणि ‘त्या’ नात्यातच जगण्याचा प्रयत्न करतात. 

आपल्याला एखादी व्यक्ती आवडते म्हणून आपण त्याच्या प्रेमात पडतो
, नातं निर्माण करतो. त्यामुळे नातं निर्माण झाल्यानंतर तो बदलला पाहिजे अशी अपेक्षा बाळगणं जरा अवास्तव आहे. त्यामुळे नातं, माणसांना बदलण्यासाठी निर्माण करायचं नसतं. नात्यातल्या स्नेहामुळे माणूस बदलला तर गोष्ट निराळी. आणि असं झालं तरच आपण त्याच्यासोबत सुखात राहु शकतो हेच खरं. असा टर्निंग पॉंईट प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येतोच या पॉंईटला नकारात्मक न घेता सकारत्मक पद्धतीनं घेतलं की आयुष्य आजूनही सुंदर आणि चांगलं वाटू लागतं... आपण खऱ्या मनानं जपलेलं नातं जवळ नसलं तरी ते नातं आपण जगलोय आणि ते कायम आपलंच होतं आणि राहील असं समजून जगायचं... यापेक्षा मोठं सुख अजून काय असेल....