मानवी संस्कृतीच्या उदयासोबतच सौंदर्यसंस्कृतीचाही उदय झाला. याच संस्कृतीत वावरत असताना मानवाने आपले सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्व जोपासण्यासाठी वेगवेगळ्या आणि नाविन्यपुर्ण कला-कल्पनांना जन्म दिला. सुंदर आणि आकर्षक दिसण्याच्या प्रेरणेतून मानवाने यात वैशिष्ट्यपुर्णरित्या भर घातली. यातूनच पुढे सौंदर्यशास्त्राचा विकास झाला. डोळे, नखे, त्वचा आणि केश अशा स्वतंत्र शाखांमुळे सौंदर्यशास्त्र बहरास येऊ लागले. केसांचा पोत, आकार, लांबी व रचना ह्या पुरुष आणि स्त्रीचे सौंदर्य खुलवण्यात महत्त्वाची भुमिका निभावत असतात. आहार, निसर्गऋतू, समाजरचना, धर्म, संस्कृती आणि भौगोलिकतेचा व्यक्तिच्या राहणीमानावर तसेच त्याच्या एकंदर सौंदर्यावर होत असतो हे विज्ञानाने सिद्ध झालेले आहे. आजच्या आपल्या जीवनशैलीचे निरीक्षण केल्यास आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मानवी जीवन आणि पद्धती पूर्णपणे बाधित झालेले आहे, मग त्यास मानवी आरोग्य आणि सौंदर्यदेखील अपवाद ठरू शकत नाही. आपल्याकडे केसांच्या आरोग्याबाबत तसेच केशकर्तन आणि त्यांची देखभाल करण्याच्या दृष्टीकोनातून केशकर्तन व्यवसायाच्या बाबतीत म्हणावी तशी सजगता अथवा गंभीरता अजुनही फारशी दिसुन येत नाही.
केशकर्तनाच्या पारंपारिक व्यवसायाकडे पाहिल्यास ह्या व्यवसायास आजही भारतात म्हणावी तशी सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली दिसून येत नाही. उत्तम केस कापण्याकरीता चांगल्यात चांगले कौशल्य आणि सजावट असलेले दुकान शोधण्याचा प्रत्येक भारतीय मानसिकतेचा प्रयत्न आपणास सर्वतोपरी पहावयास मिळतो. मात्र केशकर्तनकार बनणे (न्हावी) हा करिअर म्हणून उत्तम पर्याय ठरु शकतो अशी मानसिकता बाळगणारे पालक आणि करिअर म्हणून स्वीकारणारे तरुण फार अल्प प्रमाणात आढळतात. आजही या व्यवसायावर एका विशिष्ठ समाजाचीच मालकी परंपरा असून केशकर्तनाचा व्यवसाय हा अजुनही त्याच मागास तंत्रज्ञानाद्वारे केला जातोय. एकीकडे मागास तंत्रज्ञान आणि अकुशल कामगार तर दुसरीकडे जागतिकीकरणाने बदललेली व्यावसायिकतेची व बाजारपेठेची संकल्पना अशा कात्रीत सापडलेल्या पारंपारिक व्यवसायाला नवी दिशा व एक सकारात्मक दृष्टीकोण हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांना द्यायचा होता. व्यावसायिक-सामाजिक स्तरावर किर्ती प्राप्त करुन देण्याच्या स्वप्नाने झपाटलेला जावेद आजही नवनवीन प्रयोगात्मक कल्पनांना उजागर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय.
संशोधनात्मक प्रयोग, शास्त्रशुद्ध अध्ययन, अविराम प्रयत्न यामुळे जावेद हबीब हे नाव काही वर्षातच हेअर डिझायनिंग क्षेत्रात जागतिक पटलावर नावारुपास आले. केशकर्तन हा जावेदला वंशपरांपरागत मिळालेला वारसा जरी असला तरी त्याचा उद्देश मात्र हा उदार मनाचा आणि वाखण्याजोगा होता. न्हावी या शब्दाला त्याला सामाजिक मान्यता प्राप्त करुन द्यायची होती आणि आहे. आजच्या घडीला जावेदच्या प्रोफेशनल हेअर स्टायलिंग आणि टेक्निक्स्मुळे त्याला आंतरराष्ट्रीय हेअर ड्रेसिंग जगतात मानाचे स्थान आहे. एक आंतरराष्ट्रीय ब्रॅंड म्हणून जावेद कधीच इस्टॅब्लिश झालाय. संपूर्ण भारतात जे.एच.एच.बी.एल (जावेद हबीब हेअर आणि ब्युटी सलोन लिमिटेड) ची शेकडो केंद्रे आहेत. त्याचबरोबर त्याने स्वतःची जावेद हबीब प्रोफेशनल इन्स्टिट्यूट उभारली आहे. या इन्स्टिट्यूटमधून हजारो विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन केशकर्तन व्यवसायात यशस्वी वाटचाल करत आहेत. जावेदला न्हावी असण्याचा पूर्णपणे अभिमान आहे. त्याने घेतलेले अनुभव, मिळवलेली आधुनिक माहिती, शिकलेले तंत्रज्ञान देशातील ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो.
२ नोव्हेंबर १९८६ ला जावेदने उच्च शिक्षण मिळवण्यासाठी लंडनमधील विडॉल स्कूल ऑफ कटिंग ऍण्ड स्टायलिंग मध्ये प्रवेश मिळवला. सतत काहीतरी नाविन्याच्या शोधात असलेल्या जावेदने १९८९ साली सलग २४ तासात ४१० लोकांचे केशकर्तन करून एक विश्वरेकॉर्ड स्वतःच्या नावावर कोरला.
स्वत:च्या कामाबद्धल बोलतांना जावेद बोलतो की ’कुठलेही काम हे लहान किंवा मोठे नसते. विचार मोठा असेल तर आपण कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो.’ जावेदची स्वलिखीत काही ग्रंथसंपदा देखील प्रसिद्ध झालेली आहे. लवकरच तो त्याचे पूर्ण साहित्य मराठी भाषेत देखिल अनुवादीत करून पुन: प्रसिद्ध करणार आहे.
आपल्या केसांचे सौंदर्य कसे अबाधित ठेवता येईल ? यासाठी कुठले पथ्य पाळणे गरजेचे आहे? आपल्या व्यक्तिमत्वाला कुठल्या प्रकारची केशरचना योग्य असेल ? यासंबंधी प्रयोगात्मक अध्ययन आणि संशोधन आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त केशरचनाकार जावेद हबीब यांनी केलेले आहे. जावेद हबीब यांचे केसांची निगा व काळजी , केसांच्या रचना असे केशकर्तन व्यवसायास मार्गदर्शक ठरणारे आधुनिक, शास्त्रशुद्ध व सचित्र लेखन बाजारात उपलब्ध आहे. या विषया संबधी सखोल माहितीसाठी www.jawedhabib.co.in या संकेतस्थळाला नक्की भेट द्या-
प्रकाशित पुस्तकांची नावे-
१) JAWED HABIB- Hair Care for All Seasons -जावेद हबीब- ऋतुओं के अनुकूल बालों की देखरेख. (शब्द संसार प्रकाशन)
२) HAIR COLOR STYLE- A Complete Know-How On Hair Care And Style ( विस्डम ट्री पब्लिकेशन )
३) PROFESSIONAL Hairstyling- Jawed Habib. (यु.बी.एस पब्लिकेशन)
Wednesday, April 20, 2011
Monday, April 18, 2011
फेसबुक : बदललेल्या माणसाचा बदलेला चेहरा
महान कवी कालिदास यांनी आपल्या एका महाकाव्यात एक असे कवन रचले आहे की ज्यामध्ये प्रेमी आपल्या प्रेमिकेला ढगांमार्फत संदेश पाठवितो. ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ ही म्हण का तयार झाली असावी याचा प्रत्यय या कवनातून येतो. मार्क झुकेरबर्ग याने कदाचित कालिदासांचे हे कवन वाचले असावे आणि या कवनामधूनच स्फूर्ती घेऊन त्याने फेसबुक निर्माण केले असावे.
ज्या तरुणाला फेसबुक माहित नाही तो तरुण आजच्या तरुणाईच्या दृष्टीकोनातून ‘गावंढळ’ ठरतो. पूर्वी पाहूणे घरी आले तर घरातला मुलगा वा मुलगी टी. व्ही बघते, असे दृश्य असायचे. पण सहस्त्रकानुसार तरुणाई पण बदलली. साधन बदलले. टी.व्ही ऐवजी आज मुलगा वा मुलगी फेसबुक वर असते. त्याला पाहुण्यांशी गप्पा मारायला वेळ नसतो पण त्याचवेळी कधीही न पाहिलेल्या, कधीही न भेटलेल्या व्यक्तींशी तो मनमोकळेपणे ‘चॅट’ करत असतो.
चे गव्हेरा, फिडेल कॅस्ट्रोंना आदर्श मानणाऱ्या, गव्हेरा सारखी हेअर स्टाईल ठेवणाऱ्या, खिशात दमडी नसताना प्रेयसीला चंद्र तारे तोडून आणण्याची भाषा करणाऱ्या पिढीची ही नेक्स्ट जनरेशन आहे. ही नेक्स्ट जनरेशन पण क्रांती घडवते, व्यवस्था बदलवून टाकते. पण येथेही साधन बदलले. रस्त्यावर उतरुन हातात दगड न घेता निव्वळ फेसबुक वरुन तो एकाचवेळी हजारो जणांना ‘मेसेज’ करतो आणि एका बलाढ्य राष्ट्रामध्ये सत्तांतर घडवितो. ४५ वर्षांहून अधिक काळ रखडलेलं एक विधेयक संमत होण्यासाठी तो सरकारवर दबाव आणतो.
आज एखाद्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाठवली जात नाही, तर त्या कार्यक्रमाचं रुपांतर ‘इव्हेंट’ मध्ये होऊन ज्याला निमंत्रण पाठवायचे असेल त्यास ‘टॅग’ केले जाते. पूर्वी आपलं मत व्यक्त करणाऱ्या व्यक्तीचा एकतर सन्मान केला जात असे वा त्यास शिव्यांची लाखोली वाहिली जात असे. मते व्यक्त करणाऱ्या व्यक्तीच्या मतास अनुकूलता दर्शविण्यासाठी त्या मतास ‘लाईक’ केले जाते वा ‘कमेंट’ दिली जाते.
फेसबुक हे विश्वच वेगळं आहे, फेसबुक वर एखाद्या मित्राशी तास न तास ‘चॅट’ केले जाते पण तोच जर समोर आला तर दहा मिनीटामध्ये संवाद संपतो. प्रेमात पडलेल्या जोडप्यांची समीकरणे देखील आज बदलली आहेत. जोडप्यामधलं एक ‘चॅट’ द्वारे इतरांशी भावनिक बंध जुळवू पाहतो. पण दुसरा मात्र फेसबुक मधून आपला खरा ‘फेस’ शोधत असतो. हे असं का घडावं? म्हणजे आपण तांत्रिकदृष्ट्या गब्बर झालो पण भावनिक दृष्ट्या दरिद्री होत चाललोय, त्याचं काय. तंत्रज्ञानाच्या मागे लागून आपण आपल्या जीवनाचं तंत्र हरवत चाललोय, वेळ काढून जरा आपल्या आयुष्याच्या हरवत असलेल्या क्षणांना ‘पोक’ करु या.
ज्या तरुणाला फेसबुक माहित नाही तो तरुण आजच्या तरुणाईच्या दृष्टीकोनातून ‘गावंढळ’ ठरतो. पूर्वी पाहूणे घरी आले तर घरातला मुलगा वा मुलगी टी. व्ही बघते, असे दृश्य असायचे. पण सहस्त्रकानुसार तरुणाई पण बदलली. साधन बदलले. टी.व्ही ऐवजी आज मुलगा वा मुलगी फेसबुक वर असते. त्याला पाहुण्यांशी गप्पा मारायला वेळ नसतो पण त्याचवेळी कधीही न पाहिलेल्या, कधीही न भेटलेल्या व्यक्तींशी तो मनमोकळेपणे ‘चॅट’ करत असतो.
चे गव्हेरा, फिडेल कॅस्ट्रोंना आदर्श मानणाऱ्या, गव्हेरा सारखी हेअर स्टाईल ठेवणाऱ्या, खिशात दमडी नसताना प्रेयसीला चंद्र तारे तोडून आणण्याची भाषा करणाऱ्या पिढीची ही नेक्स्ट जनरेशन आहे. ही नेक्स्ट जनरेशन पण क्रांती घडवते, व्यवस्था बदलवून टाकते. पण येथेही साधन बदलले. रस्त्यावर उतरुन हातात दगड न घेता निव्वळ फेसबुक वरुन तो एकाचवेळी हजारो जणांना ‘मेसेज’ करतो आणि एका बलाढ्य राष्ट्रामध्ये सत्तांतर घडवितो. ४५ वर्षांहून अधिक काळ रखडलेलं एक विधेयक संमत होण्यासाठी तो सरकारवर दबाव आणतो.
आज एखाद्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाठवली जात नाही, तर त्या कार्यक्रमाचं रुपांतर ‘इव्हेंट’ मध्ये होऊन ज्याला निमंत्रण पाठवायचे असेल त्यास ‘टॅग’ केले जाते. पूर्वी आपलं मत व्यक्त करणाऱ्या व्यक्तीचा एकतर सन्मान केला जात असे वा त्यास शिव्यांची लाखोली वाहिली जात असे. मते व्यक्त करणाऱ्या व्यक्तीच्या मतास अनुकूलता दर्शविण्यासाठी त्या मतास ‘लाईक’ केले जाते वा ‘कमेंट’ दिली जाते.
फेसबुक हे विश्वच वेगळं आहे, फेसबुक वर एखाद्या मित्राशी तास न तास ‘चॅट’ केले जाते पण तोच जर समोर आला तर दहा मिनीटामध्ये संवाद संपतो. प्रेमात पडलेल्या जोडप्यांची समीकरणे देखील आज बदलली आहेत. जोडप्यामधलं एक ‘चॅट’ द्वारे इतरांशी भावनिक बंध जुळवू पाहतो. पण दुसरा मात्र फेसबुक मधून आपला खरा ‘फेस’ शोधत असतो. हे असं का घडावं? म्हणजे आपण तांत्रिकदृष्ट्या गब्बर झालो पण भावनिक दृष्ट्या दरिद्री होत चाललोय, त्याचं काय. तंत्रज्ञानाच्या मागे लागून आपण आपल्या जीवनाचं तंत्र हरवत चाललोय, वेळ काढून जरा आपल्या आयुष्याच्या हरवत असलेल्या क्षणांना ‘पोक’ करु या.
Subscribe to:
Posts (Atom)