आज असंच सुचलं एका नव्या विषयावर लिहीण्याचं... तसं मी यासंबधी काही लिहीन असं मला स्वतःलाच कधी वाटलं नव्ह्तं... कारण लग्नाबाबतचा बुळचट विषय मलाच कधी आवडलाच नाही... पण स्वतः कांद्येपोह्याचा अनुभव घेतल्यावर मात्र ... तो अनुभव लिहून ठेवावासा वाटला...
माझं वय सध्या २४ , पहिलं स्थळ पाहिलं ते गेल्यावर्षी तेव्हा मी होती २३ वर्षाची. तसं म्हणायला गेलं तर हे लग्नाचं वय नाही तरी पण... ते म्हणतात ना! मुलीचं लग्न योग्य वयातच झालं पाहिजे... तेच हे वय असावं बहुतेक... कारण सध्या माझ्या मित्र- मैत्रिणींच्या लग्नाच्या पत्रिका येत आहेत, कोणी मेसेज करुन लग्नाचं आमंत्रण देतंय तर कोणी फ़ेसबुकवर लग्नपत्रिका टाकून टॅग करत आहेत... कोणा ना कोणाचं लग्न ठरलंय, साखपुडा झालाय... अशा बातम्या तर रोज ऐकायला मिळ्ताहेत... कोणी जुना मित्र मैत्रिण भेटलं की तोच विषय... काय मग कधी करताय? काय मग तुमचं कधी वाजतंय? शेजारी... त्यांना तर काही कामधंदाच नसतो... बघताय का मग मुलीसाठी स्थळ ? असं घरी येऊन मुद्दाम आई बाबा ला डिवचून जाणार.... हुश्श्श! लग्न लग्न लग्न ... च्यायला सारखं तेच ते... घरात ते बाहेर पण तोच विषय... आपण खरंच एवढं मोठ्ठ झालोय की आता लग्न केलं पाहिजे... हा नेहमी मला पडलेला प्रश्न... पण आता बहुतेक मनावर घ्यायला हवं माझ्या लग्नाचं, असं घरच्यांनी ठरवलं... आणि मग सुरु झाला कांदे-पोहे कार्यक्रम...
आतापर्यंत झालेला माझा पहिला आणि शेवटचा कांदे पोहे कार्यक्रम ( मुलगी बघण्याचा कार्यक्रम ) ... अशी लोकं स्थळ आणतात जी मुलीला पण ओळखत नसतात आणि मुलाला पण ओळखत नसतात... पण त्यांचं कौतुक असं करतात की... बस रे बस्स्स... आणि या लोकांचं एक असतं आजच्या या स्वार्थी जगात या लोकांची दोन्ही पक्षाकडून काहीच अपेक्षा नसते... सारं काही स्वखर्चाने आणि निरपेक्ष वृत्तीने हे लोक करत असतात. यांना पाहिलं की पटतं, लष्कराची भाकरी भाजणे म्हणजे काय... असो, विषयांतर नको.
मला लग्नासाठी मुलगा कसा हवा हा मावशीने मला विचारलेला प्रश्न? (च्यायला असं काही मी ठरवलंच नाही, मुलगा जणू काही मार्केटमध्ये मिळत असल्यासारखाच हा प्रश्न होता... कसा हवा सांगितला की मावशी लगेच आणून देणार... फालतुगिरी नुसती) आता अपेक्षा म्हटलं की तो पांढऱ्या घोड्यावर बसून येणारा राजकुमारासारखा असावा असं वाटायला ही काय फिल्मी लाईफ आहे का? पण काही मुली खरंच स्वप्नाळू असतात. DDLJ मधल्या ‘मेरे ख्वाबों में जो आये... या काजोलने गायलेल्या गाण्याप्रमाणेच काहींची स्वप्न असतात. मला मात्र कधी अशी स्वप्न सुचलीच नाही...कदाचित माझं प्रेम वेगळं असावं आणि ज्यांच्यावर माझं प्रेम आहे त्यांच्या प्रेमातून इतर गोष्टी सुचल्याच नसाव्यात... माझं कुटुंब म्हणजे माझं पहिलं प्रेम... आणि माझा जॉब म्हणजे माझं दुसरं प्रेम... आहे ना अतरंगी... पण खरं सांगू का या दोहोंशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाच करु शकत नाही. कदाचित माझं हे प्रेम एका लेखाचा विषय होऊ शकतो.
मुलगा असा हवा, तसा हवा... या मताची मी मुळीच नाही... जशी मी आहे तसाच तोही असावा... मोठ्य़ा पगाराची नोकरी, दिसायला स्मार्ट वगैरे अशी माझी मुळीच इच्छा नाही, फक्त मी जशी आहे तशी त्याला आवडावी आणि तो जसा आहे तसा मला आवडावा... फक्त स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची त्याची धडपड असावी... त्याची स्वप्ने ही माझी असावीत आणि माझी स्वप्ने त्याची... मग त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी दोघांची एकमेकांना साथ असावी... बस्स्स्स इतकंच नेहमी वाटलं, यापलीकडे जाऊन कधी विचार करायला जमलेच नाही...
माझ्यासाठी पाहिलेलं पहिलं स्थळ... माझ्या मावशीच्या सुनेच्या आईने सुचविलेलं... मी तर त्यांना ओळखतपण नव्हते... पण त्यांनी माझी बरीच माहिती काढली होती मावशीकडून... आणि मावशीची सून तर माझी मैत्रिणच होती त्यामुळे माझ्याबद्दल बरंच माहित होतं तिला... हा मुलगा माझ्यासाठी बघायचा असं तिनेच सांगितलं... घरच्यांनी सांगितल होतं पण त्यांचं काही मी ऎकलं नाही... मुलगा बघायच्या आधीच नकार देऊन मोकळी झाले होते... मग सगळ्यांचा उत्साह बघून मी पण ठरवलं ठीक आहे ... पाहू या!
आणि मग ठरलं, कांदेपोहे कार्यक्रम... लग्नाच्या मार्केटमध्ये जास्त भाव असणारे म्हणजे... इंजिनीयर, डॉक्टर, सरकारी नोकरी करणारा... प्रत्येक आईला आपला जावई इंजिनीयर, डॉक्टरच हवा असतो... तोच प्रकार माझ्या घरी ही झाला.... मुलगा इंजिनियर आहे... चांगला आहे... आणि हो आपल्या गावकडेच त्यांचं गाव आहे... (च्यायला... मी माझ्या गावाला कधी नाही गेले.. आणि तो आपल्या गावाजवळचा आहे म्हणून हे स्थळ आपण बघायचं... तो तरी गेला असेल का कधी त्याच्या गावी ..याचा विचार करुन फक्त हसूच येते.)
कांदेपोहे कार्यक्रम माझ्या मावशीच्या घरीच घाटकोपरला घ्यायचा ठरला... कारण मुलगा घाटकोपरला राहणारा त्याला यायला जवळ पडेल म्हणून घरच्याचां हा निर्णय... मुलगा आणि त्याचे आई बाबा असे तीनच जण येणार असं मला कळलं... आमचं घर ठाण्याला ... सकाळपासूनच घरी टिवटिव चालू होती आईची..हे कर ते कर.. साडी घालायची जरा नीट राहा ना ... मी एकदम शांत... चेहऱ्यावर कसलेच भाव नव्ह्ते त्यामुळे आई अजूनच चिडली... मनाची तयारी नसताना मुलगा बघायला मी तयार झाले होते. तर मुलगा बघायला त्यांच्याकडेच जा त्यांच्या ते ही त्यांच्या सोयीसाठी... ही गोष्टच डोक्यात गेली होती... मुलगा खूप बिझी असतो, त्याला अजिबात वेळ नसतो तरी त्याचे आई बाबा त्याला घेऊन येणार आहेत... ( च्यायला... मी काय रिकामी बसलीये का त्याच्यासाठी, जे त्याला बघायला मी जाऊ ... पुन्हा हा मनात आलेला विचार..) सगळा राग- वैताग करुन पोहोचलो आम्ही मावशीकडॆ... मी माझे आई- बाबा आणि लहान भाऊ.
संध्याकाळी पाच वाजता पाहुणे येणार.... ज्यांनी स्थळ आणलं होतं त्या सुरु झाल्या, मुलाच्या फॅमिलीबद्दल सांगायला... असं तसं बरंच काही... मी बसले होते मोबाईलवर गेम खेळत... मावशीने लगेच प्रश्न करायला सुरवात.. साडी घालणार का? जरा फ्रेश हो जा... कटांळली आहेस का?... पोहे बनवशील का? तिचे प्रश्न काही केल्या संपतच नव्ह्ते... मी शांत डोक्याने फक्त गेम खेळत बसले तिचे सगळे प्रश्न डोक्यावरुन गेले... पाहुणे येण्याची वेळ जशी जवळ यायला लागली... तशी मग माझ्या मनाची वाट लागली... स्वतःचा राग आला होता खूप... का आपण इतके मोठे झालो... हा फालतुपणा नकोय मला.... बघायचं बिगायचं... आता काय फायदा विचार करुन हा सगळा... तितक्यात माझे दादा( मावशीची मुलं ) मला पिडायला लागले... माझा इंटरव्ह्युव घ्यायला लागले... काय बोलणार तु ? घाबरली आहेस का ? चिडवायला लागले ... जरा मजा मस्ती करुन मग पोहे करायला सांगितले मावशीने ... पोहे करताना हसू आले होते आणि रडू पण आले होते... आपलं काय होणार आता या विचाराने... कसं बसायचं ? कसं बोलायचं? कसं हसायचं?काय सांगायचं? कोणाकडे बघायचं, कसं बघायचं? त्याच्याकडे पाहायचं की नाही? कसा असेल तो? आवडेल का मला तो? न विचार करता पण असे फालतू प्रश्न मला पण पडतच होते... हे विचार मनात आपोआपच यायला लागले... पहिल्यांदा असली बॅण्ड वाजली होती ना... बस्स रे बस्स... अशा पद्धतीचा कार्यक्रम पहिल्यांदाच घरात होत असल्याने घरचे वातावरण अति उत्साही... आणि मी मात्र निरुत्साही!
तितक्यात पाहुणे आले... मावशी सातव्या मजल्यावर राहत होती आणि नेमकी त्या दिवशी लिफ्ट बंद... पाहुणे खूप थकले होते सात मजले चढून, .मग भाऊ सांगत आला. मुलगा नाही आला त्याचे आई बाबा आलेत... हे ऐकून मला तर खूपच आनंद झाला होता... बरं झालं नाही आला...
मग माझी तयारी झाली... साडी नाही तर एक छानसा ड्रेस घातला होता मी... मेकअप थापलाच नाही जशी आहे तशीच ... बाहेर यायला खरं तर भीती वाटत होती मला पण मी पत्रकार म्हणजे जास्तच ठसकेबाज, हुशार, शूरवीर असल्यासारखे माझे भाऊ मला चिडवत होते.... तु घाबरतेस शीइइइइइ... अगं तु घे त्याच्या आई बांबा चा इंटव्ह्युव्ह... माझी मस्करी, मजा घेत होते... मावशी ने तोपर्यंत त्यांना पाणी दिले होते... मला चहा आणि पोहे घेऊन जा म्हणाली... मी नाही तु जा मावशी... मी असंच जाऊन बसते ना ... थोडं मावशीला पटवलं पण ती पण ऐकते कसली, पोह्याचं दिलं माझ्याकडे आणि चल माझ्याबरोबर म्हणत घेऊन गेली मला... पाहुणे बसले होते... मुलाचे बाबा खुर्चीत बसले बाजूला माझे काका... आणि मुलाची आई खाली चटईवर भारतीय बैठक मारुन बसल्या होत्या... त्याचे बाबा तर दिसायला एकदम रुबाबदार, आई पण मस्त सुंदर आणि सोज्वळ आणि एकदम शांत... मी शांतपणे गेले त्याच्यासमोर, खाली बस असं मला सांगितलं होतं ... पण काकाने सोफ्यावर बस असं डोळ्यानीच सांगितलं ... त्याचे आई-बाबा माझ्याकडे बघतच होते... तितक्यात पप्पा ने विचारले मुलगा नाही आला का? त्याचे बाबा म्हणाले, आज रविवार ना एक दिवस सुट्टी असते त्याला, त्याला ना फिरायला फार आवडतं... मित्रांबरोबर बाहेर गेलाय त्यामुळे नाही जमले त्याला यायला... ( च्यायला पुन्हा असला राग आला ना... त्याला रविवारी सुट्टी असते फिरायला आवडतं म्हणून फिरायला गेला... मी तर रिकामीच आहे मला तर काहीच आवडत नाही ना? फिरायला गेला म्हणे ) त्याच्या बाबानी मला प्रश्न विचारले
काय शिकली आहेस... माझ्याबद्दल बरंच काही मी बोलले... मी इतकं बोलते हे माझ्या घरचे पहिल्यांदाच बघत होते... आणि मी पण पहिल्यांदाच स्वतःबद्दल एकदम सिरियस होऊन बोलत होते... तसे त्यांना माझ्या क्षेत्राविषयी माहित होतं.. त्यांचं वाचन पण चांगलं असावं असं जाणवलं... मिडियामध्ये त्याचे काही मित्र आहेत असंही ते म्हणाले... आता जरा मला बरे वाटले.. अगदीच फालतू प्रश्न तरी नाही विचारले... त्याची आई फारच शांत .. काहीच बोलल्या नाहीत... पोहे छान झाले आहेत असे त्याचे बाबा म्हणाले...
मग विषय सुरु झाला मुलाचा... आजकालची मुलं माहीत आहेत.. आपलं काही ऐकत नाही आणि आपण त्यांना काही बोलू शकत नाही... मुलगी छान आहे.. दोघांची पसंती असेल तर आपण बघू ! मुलगा तसा माझ्या शब्दाबाहेर नाही ... मुलगा इजिनिअर आहे..नामांकित कंपनीत नोकरीला आहे... असं बरचं सांगितलं... बोलता बोलता... ते आमचे नातेवाईकच आहेत... आजीच्या नात्यातून असं स्पष्ट झालं... (च्यायला आता नातं निघालं म्हणजे माझी तर वाटच ) माझं लक्ष तर नव्हतचं... मुलगा नाही आला ना तेच बरं झालं... माझ्यासाठी ह्या काद्यापोह्याचा विषय इथेच संपणार होता ... आता आई आणि मावशी त्याच्या आईला घेऊन आत गेल्या ... हळदी कुंकुसाठी... तेव्हा बोलता बोलता त्या म्हणाल्या... मला महितच नव्ह्तं मुलगी बघायला जातोय... हे काही बोलले नाही.. मी येताना काही घेऊन तरी आले असते... हे ऐकल्यावर तर माझा राग अनावरच झाला होता... तेव्हा मी काहीच बोलले नाही ... त्यांनी मला माझे नाव विचारले... अर्चना सांगितले.. तर त्याचे नाव पण अर्चनाच आहे असं त्या म्हणाल्या... माझा थोडं कौतुक केलं आणि त्या निघाल्या... मावशी, काका, पप्पा त्यांना सोडायल गेले ... हुश्श्श... संपला एकदाचा कांदेपोहे कार्यक्रम... मला तर खूप भूक लागली होती... वहिनीने मला पोहे दिले मस्त आरामात सोफ्यावर खात बसले मी... तितक्यात वहिनीचा भाऊ म्हणाला मुलगा बघायचा का तुला ... एफ बी वर आहे तो... हो दाखव म्हणाले मी... तर मला म्हणाला तुला बरं त्याला बघायची घाई झाली... त्याला म्हणाले जा नको दाखवू... मग मुद्दाम मला चिडवायला लागला... मग दाखवला फोटो ... फोटो नाही आवडला ... मग पत्ता कट त्याचा ! असं बोलून मस्त मोबाईलवर गेम खेळण्यात परत बिझी झाले...
पहिले कांदे पोहे म्हणजे भारीच होते... त्याचे आईबाबा मला पाहून गेले आणि मी मुलगा पाहिला तो फेसबुकवर...असे माझे भारी फेसबुके कांदेपोहे...
माझं वय सध्या २४ , पहिलं स्थळ पाहिलं ते गेल्यावर्षी तेव्हा मी होती २३ वर्षाची. तसं म्हणायला गेलं तर हे लग्नाचं वय नाही तरी पण... ते म्हणतात ना! मुलीचं लग्न योग्य वयातच झालं पाहिजे... तेच हे वय असावं बहुतेक... कारण सध्या माझ्या मित्र- मैत्रिणींच्या लग्नाच्या पत्रिका येत आहेत, कोणी मेसेज करुन लग्नाचं आमंत्रण देतंय तर कोणी फ़ेसबुकवर लग्नपत्रिका टाकून टॅग करत आहेत... कोणा ना कोणाचं लग्न ठरलंय, साखपुडा झालाय... अशा बातम्या तर रोज ऐकायला मिळ्ताहेत... कोणी जुना मित्र मैत्रिण भेटलं की तोच विषय... काय मग कधी करताय? काय मग तुमचं कधी वाजतंय? शेजारी... त्यांना तर काही कामधंदाच नसतो... बघताय का मग मुलीसाठी स्थळ ? असं घरी येऊन मुद्दाम आई बाबा ला डिवचून जाणार.... हुश्श्श! लग्न लग्न लग्न ... च्यायला सारखं तेच ते... घरात ते बाहेर पण तोच विषय... आपण खरंच एवढं मोठ्ठ झालोय की आता लग्न केलं पाहिजे... हा नेहमी मला पडलेला प्रश्न... पण आता बहुतेक मनावर घ्यायला हवं माझ्या लग्नाचं, असं घरच्यांनी ठरवलं... आणि मग सुरु झाला कांदे-पोहे कार्यक्रम...
आतापर्यंत झालेला माझा पहिला आणि शेवटचा कांदे पोहे कार्यक्रम ( मुलगी बघण्याचा कार्यक्रम ) ... अशी लोकं स्थळ आणतात जी मुलीला पण ओळखत नसतात आणि मुलाला पण ओळखत नसतात... पण त्यांचं कौतुक असं करतात की... बस रे बस्स्स... आणि या लोकांचं एक असतं आजच्या या स्वार्थी जगात या लोकांची दोन्ही पक्षाकडून काहीच अपेक्षा नसते... सारं काही स्वखर्चाने आणि निरपेक्ष वृत्तीने हे लोक करत असतात. यांना पाहिलं की पटतं, लष्कराची भाकरी भाजणे म्हणजे काय... असो, विषयांतर नको.
मला लग्नासाठी मुलगा कसा हवा हा मावशीने मला विचारलेला प्रश्न? (च्यायला असं काही मी ठरवलंच नाही, मुलगा जणू काही मार्केटमध्ये मिळत असल्यासारखाच हा प्रश्न होता... कसा हवा सांगितला की मावशी लगेच आणून देणार... फालतुगिरी नुसती) आता अपेक्षा म्हटलं की तो पांढऱ्या घोड्यावर बसून येणारा राजकुमारासारखा असावा असं वाटायला ही काय फिल्मी लाईफ आहे का? पण काही मुली खरंच स्वप्नाळू असतात. DDLJ मधल्या ‘मेरे ख्वाबों में जो आये... या काजोलने गायलेल्या गाण्याप्रमाणेच काहींची स्वप्न असतात. मला मात्र कधी अशी स्वप्न सुचलीच नाही...कदाचित माझं प्रेम वेगळं असावं आणि ज्यांच्यावर माझं प्रेम आहे त्यांच्या प्रेमातून इतर गोष्टी सुचल्याच नसाव्यात... माझं कुटुंब म्हणजे माझं पहिलं प्रेम... आणि माझा जॉब म्हणजे माझं दुसरं प्रेम... आहे ना अतरंगी... पण खरं सांगू का या दोहोंशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाच करु शकत नाही. कदाचित माझं हे प्रेम एका लेखाचा विषय होऊ शकतो.
मुलगा असा हवा, तसा हवा... या मताची मी मुळीच नाही... जशी मी आहे तसाच तोही असावा... मोठ्य़ा पगाराची नोकरी, दिसायला स्मार्ट वगैरे अशी माझी मुळीच इच्छा नाही, फक्त मी जशी आहे तशी त्याला आवडावी आणि तो जसा आहे तसा मला आवडावा... फक्त स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची त्याची धडपड असावी... त्याची स्वप्ने ही माझी असावीत आणि माझी स्वप्ने त्याची... मग त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी दोघांची एकमेकांना साथ असावी... बस्स्स्स इतकंच नेहमी वाटलं, यापलीकडे जाऊन कधी विचार करायला जमलेच नाही...
माझ्यासाठी पाहिलेलं पहिलं स्थळ... माझ्या मावशीच्या सुनेच्या आईने सुचविलेलं... मी तर त्यांना ओळखतपण नव्हते... पण त्यांनी माझी बरीच माहिती काढली होती मावशीकडून... आणि मावशीची सून तर माझी मैत्रिणच होती त्यामुळे माझ्याबद्दल बरंच माहित होतं तिला... हा मुलगा माझ्यासाठी बघायचा असं तिनेच सांगितलं... घरच्यांनी सांगितल होतं पण त्यांचं काही मी ऎकलं नाही... मुलगा बघायच्या आधीच नकार देऊन मोकळी झाले होते... मग सगळ्यांचा उत्साह बघून मी पण ठरवलं ठीक आहे ... पाहू या!
आणि मग ठरलं, कांदेपोहे कार्यक्रम... लग्नाच्या मार्केटमध्ये जास्त भाव असणारे म्हणजे... इंजिनीयर, डॉक्टर, सरकारी नोकरी करणारा... प्रत्येक आईला आपला जावई इंजिनीयर, डॉक्टरच हवा असतो... तोच प्रकार माझ्या घरी ही झाला.... मुलगा इंजिनियर आहे... चांगला आहे... आणि हो आपल्या गावकडेच त्यांचं गाव आहे... (च्यायला... मी माझ्या गावाला कधी नाही गेले.. आणि तो आपल्या गावाजवळचा आहे म्हणून हे स्थळ आपण बघायचं... तो तरी गेला असेल का कधी त्याच्या गावी ..याचा विचार करुन फक्त हसूच येते.)
कांदेपोहे कार्यक्रम माझ्या मावशीच्या घरीच घाटकोपरला घ्यायचा ठरला... कारण मुलगा घाटकोपरला राहणारा त्याला यायला जवळ पडेल म्हणून घरच्याचां हा निर्णय... मुलगा आणि त्याचे आई बाबा असे तीनच जण येणार असं मला कळलं... आमचं घर ठाण्याला ... सकाळपासूनच घरी टिवटिव चालू होती आईची..हे कर ते कर.. साडी घालायची जरा नीट राहा ना ... मी एकदम शांत... चेहऱ्यावर कसलेच भाव नव्ह्ते त्यामुळे आई अजूनच चिडली... मनाची तयारी नसताना मुलगा बघायला मी तयार झाले होते. तर मुलगा बघायला त्यांच्याकडेच जा त्यांच्या ते ही त्यांच्या सोयीसाठी... ही गोष्टच डोक्यात गेली होती... मुलगा खूप बिझी असतो, त्याला अजिबात वेळ नसतो तरी त्याचे आई बाबा त्याला घेऊन येणार आहेत... ( च्यायला... मी काय रिकामी बसलीये का त्याच्यासाठी, जे त्याला बघायला मी जाऊ ... पुन्हा हा मनात आलेला विचार..) सगळा राग- वैताग करुन पोहोचलो आम्ही मावशीकडॆ... मी माझे आई- बाबा आणि लहान भाऊ.
संध्याकाळी पाच वाजता पाहुणे येणार.... ज्यांनी स्थळ आणलं होतं त्या सुरु झाल्या, मुलाच्या फॅमिलीबद्दल सांगायला... असं तसं बरंच काही... मी बसले होते मोबाईलवर गेम खेळत... मावशीने लगेच प्रश्न करायला सुरवात.. साडी घालणार का? जरा फ्रेश हो जा... कटांळली आहेस का?... पोहे बनवशील का? तिचे प्रश्न काही केल्या संपतच नव्ह्ते... मी शांत डोक्याने फक्त गेम खेळत बसले तिचे सगळे प्रश्न डोक्यावरुन गेले... पाहुणे येण्याची वेळ जशी जवळ यायला लागली... तशी मग माझ्या मनाची वाट लागली... स्वतःचा राग आला होता खूप... का आपण इतके मोठे झालो... हा फालतुपणा नकोय मला.... बघायचं बिगायचं... आता काय फायदा विचार करुन हा सगळा... तितक्यात माझे दादा( मावशीची मुलं ) मला पिडायला लागले... माझा इंटरव्ह्युव घ्यायला लागले... काय बोलणार तु ? घाबरली आहेस का ? चिडवायला लागले ... जरा मजा मस्ती करुन मग पोहे करायला सांगितले मावशीने ... पोहे करताना हसू आले होते आणि रडू पण आले होते... आपलं काय होणार आता या विचाराने... कसं बसायचं ? कसं बोलायचं? कसं हसायचं?काय सांगायचं? कोणाकडे बघायचं, कसं बघायचं? त्याच्याकडे पाहायचं की नाही? कसा असेल तो? आवडेल का मला तो? न विचार करता पण असे फालतू प्रश्न मला पण पडतच होते... हे विचार मनात आपोआपच यायला लागले... पहिल्यांदा असली बॅण्ड वाजली होती ना... बस्स रे बस्स... अशा पद्धतीचा कार्यक्रम पहिल्यांदाच घरात होत असल्याने घरचे वातावरण अति उत्साही... आणि मी मात्र निरुत्साही!
तितक्यात पाहुणे आले... मावशी सातव्या मजल्यावर राहत होती आणि नेमकी त्या दिवशी लिफ्ट बंद... पाहुणे खूप थकले होते सात मजले चढून, .मग भाऊ सांगत आला. मुलगा नाही आला त्याचे आई बाबा आलेत... हे ऐकून मला तर खूपच आनंद झाला होता... बरं झालं नाही आला...
मग माझी तयारी झाली... साडी नाही तर एक छानसा ड्रेस घातला होता मी... मेकअप थापलाच नाही जशी आहे तशीच ... बाहेर यायला खरं तर भीती वाटत होती मला पण मी पत्रकार म्हणजे जास्तच ठसकेबाज, हुशार, शूरवीर असल्यासारखे माझे भाऊ मला चिडवत होते.... तु घाबरतेस शीइइइइइ... अगं तु घे त्याच्या आई बांबा चा इंटव्ह्युव्ह... माझी मस्करी, मजा घेत होते... मावशी ने तोपर्यंत त्यांना पाणी दिले होते... मला चहा आणि पोहे घेऊन जा म्हणाली... मी नाही तु जा मावशी... मी असंच जाऊन बसते ना ... थोडं मावशीला पटवलं पण ती पण ऐकते कसली, पोह्याचं दिलं माझ्याकडे आणि चल माझ्याबरोबर म्हणत घेऊन गेली मला... पाहुणे बसले होते... मुलाचे बाबा खुर्चीत बसले बाजूला माझे काका... आणि मुलाची आई खाली चटईवर भारतीय बैठक मारुन बसल्या होत्या... त्याचे बाबा तर दिसायला एकदम रुबाबदार, आई पण मस्त सुंदर आणि सोज्वळ आणि एकदम शांत... मी शांतपणे गेले त्याच्यासमोर, खाली बस असं मला सांगितलं होतं ... पण काकाने सोफ्यावर बस असं डोळ्यानीच सांगितलं ... त्याचे आई-बाबा माझ्याकडे बघतच होते... तितक्यात पप्पा ने विचारले मुलगा नाही आला का? त्याचे बाबा म्हणाले, आज रविवार ना एक दिवस सुट्टी असते त्याला, त्याला ना फिरायला फार आवडतं... मित्रांबरोबर बाहेर गेलाय त्यामुळे नाही जमले त्याला यायला... ( च्यायला पुन्हा असला राग आला ना... त्याला रविवारी सुट्टी असते फिरायला आवडतं म्हणून फिरायला गेला... मी तर रिकामीच आहे मला तर काहीच आवडत नाही ना? फिरायला गेला म्हणे ) त्याच्या बाबानी मला प्रश्न विचारले
काय शिकली आहेस... माझ्याबद्दल बरंच काही मी बोलले... मी इतकं बोलते हे माझ्या घरचे पहिल्यांदाच बघत होते... आणि मी पण पहिल्यांदाच स्वतःबद्दल एकदम सिरियस होऊन बोलत होते... तसे त्यांना माझ्या क्षेत्राविषयी माहित होतं.. त्यांचं वाचन पण चांगलं असावं असं जाणवलं... मिडियामध्ये त्याचे काही मित्र आहेत असंही ते म्हणाले... आता जरा मला बरे वाटले.. अगदीच फालतू प्रश्न तरी नाही विचारले... त्याची आई फारच शांत .. काहीच बोलल्या नाहीत... पोहे छान झाले आहेत असे त्याचे बाबा म्हणाले...
मग विषय सुरु झाला मुलाचा... आजकालची मुलं माहीत आहेत.. आपलं काही ऐकत नाही आणि आपण त्यांना काही बोलू शकत नाही... मुलगी छान आहे.. दोघांची पसंती असेल तर आपण बघू ! मुलगा तसा माझ्या शब्दाबाहेर नाही ... मुलगा इजिनिअर आहे..नामांकित कंपनीत नोकरीला आहे... असं बरचं सांगितलं... बोलता बोलता... ते आमचे नातेवाईकच आहेत... आजीच्या नात्यातून असं स्पष्ट झालं... (च्यायला आता नातं निघालं म्हणजे माझी तर वाटच ) माझं लक्ष तर नव्हतचं... मुलगा नाही आला ना तेच बरं झालं... माझ्यासाठी ह्या काद्यापोह्याचा विषय इथेच संपणार होता ... आता आई आणि मावशी त्याच्या आईला घेऊन आत गेल्या ... हळदी कुंकुसाठी... तेव्हा बोलता बोलता त्या म्हणाल्या... मला महितच नव्ह्तं मुलगी बघायला जातोय... हे काही बोलले नाही.. मी येताना काही घेऊन तरी आले असते... हे ऐकल्यावर तर माझा राग अनावरच झाला होता... तेव्हा मी काहीच बोलले नाही ... त्यांनी मला माझे नाव विचारले... अर्चना सांगितले.. तर त्याचे नाव पण अर्चनाच आहे असं त्या म्हणाल्या... माझा थोडं कौतुक केलं आणि त्या निघाल्या... मावशी, काका, पप्पा त्यांना सोडायल गेले ... हुश्श्श... संपला एकदाचा कांदेपोहे कार्यक्रम... मला तर खूप भूक लागली होती... वहिनीने मला पोहे दिले मस्त आरामात सोफ्यावर खात बसले मी... तितक्यात वहिनीचा भाऊ म्हणाला मुलगा बघायचा का तुला ... एफ बी वर आहे तो... हो दाखव म्हणाले मी... तर मला म्हणाला तुला बरं त्याला बघायची घाई झाली... त्याला म्हणाले जा नको दाखवू... मग मुद्दाम मला चिडवायला लागला... मग दाखवला फोटो ... फोटो नाही आवडला ... मग पत्ता कट त्याचा ! असं बोलून मस्त मोबाईलवर गेम खेळण्यात परत बिझी झाले...
पहिले कांदे पोहे म्हणजे भारीच होते... त्याचे आईबाबा मला पाहून गेले आणि मी मुलगा पाहिला तो फेसबुकवर...असे माझे भारी फेसबुके कांदेपोहे...